शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

India-china : चीनच्या 'बॉर्डर'वर पहिल्यांदाच महिला सैन्य अधिकाऱ्यास मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:34 IST

India-china : आयना राणा यांच्यावर बीआरओच्या 75 नंबर रस्त्याच्या निर्मित्तीची जबाबदारी देण्यात आली असून त्याही मोठ्या शिताफीने हे नेतृत्व सांभाळत आहेत. आयना राणा या मूळ हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत

ठळक मुद्देचीनच्या सीमारेषेवरील देशातील सर्वात शेटवचं गाव असलेल्या माणा येथपर्यंत पक्का रस्ता बनविण्याचं काम सुरू आहे. हा रस्ता देशातील सर्वात उंच असलेल्या रस्त्यांपैकी एक असणार आहे.

नवी दिल्ली - भारत-चीन सीमारेषेवर सैन्य दलासाठी सीमा रस्ते संघटन (बीआरओ) चमोली जिल्ह्यातील नीती व माणा पास यांना रस्त्यांसोबत जोडण्याचं काम पूर्ण करण्यात येत आहे. मात्र, निर्मनुष्य सीमा क्षेत्रात काम असल्या कारणाने आजपर्यंत सैन्य दलातील कुठल्याही महिला अधिकाऱ्यास याजागी बीआरओत नियुक्ती दिली नव्हती. आता, माणा दरीत देशातील सर्वात उंच ठिकाणी होणाऱ्या रस्त्यांमधील एकाची जबाबदारी पहिल्यांदाच मेजर आयना राणा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

आयना राणा यांच्यावर बीआरओच्या 75 नंबर रस्त्याच्या निर्मित्तीची जबाबदारी देण्यात आली असून त्याही मोठ्या शिताफीने हे नेतृत्व सांभाळत आहेत. आयना राणा या मूळ हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण पंजाबमधील पठाणकोठ येथे झाले. त्यांचे वडिल रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत, तर आई गृहिणी आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेल्या आयना लहानपणापासूनच सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न पाहत होत्या. त्यामुळेच, आई-वडिलांनीही त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वस्वी पाठबळ दिलं. 

आयना यांनी शिक्षण शिकत असतानाच एनसीसीच्या माध्यमातून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं पहिलं पाऊल टाकलं. एनसीसीत असताना दोनवेळा राष्ट्रीय शिबीरात सहभागी होत आपल्यातील गुणांचं प्रदर्शन केलं. सन 2011 मध्ये त्यांनी अधिकारी प्रशिक्षण अॅकॅडमी (चेन्नई) येथे प्रवेश घेतला. त्यानंतर, सप्टेंबर 2012 मध्ये तेथून पासआऊट होताच सैन्य दलात कोर ऑफ इंजिनिअर विभागात त्या रुजू झाल्या. मिलिट्री ऑफ इंजिनिअरींगमधून सिव्हील इंजिनिअर्संची पदवी पूर्ण केल्यानंतर उत्तराखंड येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली होती. 

चीनच्या सीमारेषेवरील देशातील सर्वात शेटवचं गाव असलेल्या माणा येथपर्यंत पक्का रस्ता बनविण्याचं काम सुरू आहे. हा रस्ता देशातील सर्वात उंच असलेल्या रस्त्यांपैकी एक असणार आहे. हे एक कठीण काम होतं, असे राणा यांनी म्हटलं आहे. मात्र, डीजी यांनी 75 आरसीसी मध्ये त्यांच्यासोबत आणखी काही महिला अधिकाऱ्यांना तैनात करुन कंपनीला वेगळ्या उंचीवरुन नेऊन ठेवल्याचं राणा यांनी म्हटलं आहे. त्यांच्यासमेवत तीन प्लाटून कंमांडर म्हणून अंजना, एई विष्णुमाया व एई भावना यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याच वर्षी हे काम पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं आयना यांनी सांगितलंय.       

 

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानBorderसीमारेषाroad transportरस्ते वाहतूकWomenमहिला