शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

India China FaceOff: आठ तासांच्या चर्चेनंतरही निघाला नाही तोडगा; मुकाबल्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:53 IST

एलएसीवरून हटत नाही चिनी लष्कर; लडाखच्या तणावाचे सोशल मीडियावरही पडसाद

- सुरेश एस. डुग्गर जम्मू : लडाखमध्ये एलएसीवर भारत-चीन या दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. याचे पडसाद आता सोशल मीडियावरही उमटू लागले आहेत. टिष्ट्वटरवर होणाऱ्या युद्धात एका चिनी अकाऊंटवरून तर भारताला लडाख रिकामे करण्याची धमकी दिली जात आहे, तर भारतीय यूजर टी-९० रणगाड्यांची तैनाती वटवाघळांसाठी असल्याचे सांगत आहेत. एलएसीवरील कब्जा केलेल्या भागावरून चिनी फौजेला मागे हटवण्यासाठीची चर्चेची सहावी फेरी अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या लष्करांतील वातावरण कडाक्याच्या थंडीतही तापलेलेच असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.एलएसीवरील तनातनीमध्ये सध्या काही तणाव नसला तरी सोशल मीडियावर तो जरूर वाढत आहे. लडाखचा तणाव आता कुठे-कुठे परिणाम करीत आहे, ते विविध छायाचित्रांवरून दिसत आहे.लडाख सेक्टरमध्ये एलएसीवर अनेक सेक्टरमध्ये चिनी लष्कराने कब्जा केला आहे व त्या सैन्याला मागे हटवण्यासाठी शनिवारी दौलत बेग ओल्डी (डीबीओ) भागात दोन्ही देशांत मेजर जनरल स्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या सहाव्या फेरीत ८ तास चर्चा चालली. यावेळच्या चर्चेत भारत व चीन दरम्यान पेंगाँग, देपसांग, गोगरा-हॉट स्प्रिंग भागांतील वादग्रस्त मुद्दे निकाली निघू शकले नाहीत. या चर्चेत भारताच्या बाजूचे नेतृत्व तिसºया इन्फन्ट्री डिव्हीजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अभिजीत बापट यांनी केले. यावेळी चीनने देपसांग व डीबीओ सेक्टरमधील आपले सैनिक मागे हटवावेत व तेथील कामे थांबवावीत, असे भारताने म्हटले . या भागात चीनने हजारो सैनिकांसह मोठ्या प्रमाणात रणगाडे, आर्टिलरी गन तैनात केल्या आहेत.एलएसीवरील अग्रीम भागांमध्ये मोहिमेची निगराणी करणाºया लष्कराच्या सर्व वरिष्ठ कमांडरांनी कायम सतर्कता बाळगावी व चीनच्या कसल्याही आगळीकीला तोंड देण्यासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा, असे निर्देश लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिले आहेत. याबरोबरच भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये व एलएसीवर इतरही संवेदनशील भागांमध्ये कडाक्याच्या थंडीच्या काळात सैनिक व शस्त्रांची विद्यमान संख्या कायम ठेवण्यासाठी विस्तृत योजना तयार केली आहे.भारत-चीनमध्ये का वाढला पुन्हा तणाव?चीनने वादग्रस्त भागांतून सैनिक परत घ्यावेत, अन्यथा कोणत्याही घटनेसाठी तयार राहावे, असे मेजर जनरल अभिजित बापट यांनी ठणकावल्यानंतर तणाव वाढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देपसांगमध्ये चिनी लष्कराच्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीमुळे भारताच्या प्रवेश मार्गांवर व डीजीओ रोड व उत्तरेत काराकोरममध्ये असलेल्या हवाई पट्टीला धोका निर्माण झाला आहे. पीएलएने येथे रणगाडे, तोफा, बंदुकांसह १२,००० हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. भारतीय लष्कराने या भागात काही ठिकाणी पायदळाच्या तुकड्या व एक ब्रिगेड तैनात केले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव