शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: आठ तासांच्या चर्चेनंतरही निघाला नाही तोडगा; मुकाबल्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:53 IST

एलएसीवरून हटत नाही चिनी लष्कर; लडाखच्या तणावाचे सोशल मीडियावरही पडसाद

- सुरेश एस. डुग्गर जम्मू : लडाखमध्ये एलएसीवर भारत-चीन या दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. याचे पडसाद आता सोशल मीडियावरही उमटू लागले आहेत. टिष्ट्वटरवर होणाऱ्या युद्धात एका चिनी अकाऊंटवरून तर भारताला लडाख रिकामे करण्याची धमकी दिली जात आहे, तर भारतीय यूजर टी-९० रणगाड्यांची तैनाती वटवाघळांसाठी असल्याचे सांगत आहेत. एलएसीवरील कब्जा केलेल्या भागावरून चिनी फौजेला मागे हटवण्यासाठीची चर्चेची सहावी फेरी अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या लष्करांतील वातावरण कडाक्याच्या थंडीतही तापलेलेच असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.एलएसीवरील तनातनीमध्ये सध्या काही तणाव नसला तरी सोशल मीडियावर तो जरूर वाढत आहे. लडाखचा तणाव आता कुठे-कुठे परिणाम करीत आहे, ते विविध छायाचित्रांवरून दिसत आहे.लडाख सेक्टरमध्ये एलएसीवर अनेक सेक्टरमध्ये चिनी लष्कराने कब्जा केला आहे व त्या सैन्याला मागे हटवण्यासाठी शनिवारी दौलत बेग ओल्डी (डीबीओ) भागात दोन्ही देशांत मेजर जनरल स्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या सहाव्या फेरीत ८ तास चर्चा चालली. यावेळच्या चर्चेत भारत व चीन दरम्यान पेंगाँग, देपसांग, गोगरा-हॉट स्प्रिंग भागांतील वादग्रस्त मुद्दे निकाली निघू शकले नाहीत. या चर्चेत भारताच्या बाजूचे नेतृत्व तिसºया इन्फन्ट्री डिव्हीजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अभिजीत बापट यांनी केले. यावेळी चीनने देपसांग व डीबीओ सेक्टरमधील आपले सैनिक मागे हटवावेत व तेथील कामे थांबवावीत, असे भारताने म्हटले . या भागात चीनने हजारो सैनिकांसह मोठ्या प्रमाणात रणगाडे, आर्टिलरी गन तैनात केल्या आहेत.एलएसीवरील अग्रीम भागांमध्ये मोहिमेची निगराणी करणाºया लष्कराच्या सर्व वरिष्ठ कमांडरांनी कायम सतर्कता बाळगावी व चीनच्या कसल्याही आगळीकीला तोंड देण्यासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा, असे निर्देश लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिले आहेत. याबरोबरच भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये व एलएसीवर इतरही संवेदनशील भागांमध्ये कडाक्याच्या थंडीच्या काळात सैनिक व शस्त्रांची विद्यमान संख्या कायम ठेवण्यासाठी विस्तृत योजना तयार केली आहे.भारत-चीनमध्ये का वाढला पुन्हा तणाव?चीनने वादग्रस्त भागांतून सैनिक परत घ्यावेत, अन्यथा कोणत्याही घटनेसाठी तयार राहावे, असे मेजर जनरल अभिजित बापट यांनी ठणकावल्यानंतर तणाव वाढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देपसांगमध्ये चिनी लष्कराच्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीमुळे भारताच्या प्रवेश मार्गांवर व डीजीओ रोड व उत्तरेत काराकोरममध्ये असलेल्या हवाई पट्टीला धोका निर्माण झाला आहे. पीएलएने येथे रणगाडे, तोफा, बंदुकांसह १२,००० हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. भारतीय लष्कराने या भागात काही ठिकाणी पायदळाच्या तुकड्या व एक ब्रिगेड तैनात केले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव