शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

India China FaceOff: "मोदींनी जपून बोलावे, अन्यथा चीनच्या कुटिलतेस बळ मिळेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 03:40 IST

चीनच्या कुटिल कारस्थानांना बळ मिळेल असे बोलणे टाळावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी दिला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना सध्याची वेळ संपूर्ण देशाने एकजूट होऊन चीनच्या दु:साहसास कणखरपणे उत्तर देण्याची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी जपून बोलावे आणि चीनच्या कुटिल कारस्थानांना बळ मिळेल असे बोलणे टाळावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी दिला.पंतप्रधान व केंद्र सरकारने काळाचे आव्हान स्वीकारून राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष बाबू व अन्य भारतीय सैनिकांच्या बलिदानाच्या कसोटीवर उतरावे. यात जराही कुचराई करणे म्हणजे जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात ठरेल, असेही माजी पंतप्रधानांनी म्हटले आहे. भारत चीनच्या धमक्यांपुढे कधीही झुकणार नाही आणि भौगोलिक अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असे नमूद करून निवेदनात ते लिहितात की, आज देश इतिहासाच्या एका नाजूक वळणावर उभा आहे. या घडीला आपले सरकार काय निर्णय घेते व कोणती पावले उचलते यावर भावी पिढ्या मूल्यमापन करणार आहेत. हे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी देशाच्या नेतृत्वाच्या खांद्यावर आहे. आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. जाहीर वक्तव्यांनी देशाची सुरक्षा, अखंडता यावर प्रभाव पडू शकतो याची जाणीव ठेवून पंतप्रधानांनी सावध राहायला हवे.>सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाहीचीनसोबत सीमेवर संघर्ष होऊन २० भारतीय जवानांना हौतात्म्य आल्यानंतर प्रथमच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे की, भ्रामक प्रचार कधीही कूटनीती व खंबीर नेतृत्वाला पर्याय होऊ शकत नाही. तसेच स्तुतिपाठकांनी असत्याचे अवडंबर माजविले तरी त्याने सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी