शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 11:33 IST

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे.

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेने मिग १९ लढाऊ विमान आणि चिनूनक हैवीलिफ्ट विमान सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर नाईट ऑपरेशन केले. गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला.

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वायूदलानेही लढाऊ विमानं सीमेजवळील एअरबेसवर तैनात केली आहे.

याबाबत ज्येष्ठ लढाऊ पायलट ग्रुप कॅप्टन ए राठी म्हणाले की, नाइट ऑपरेशन हे एखाद्या सरप्राइज सारखं असतं, ज्यामुळे वायूसेना आधुनिक प्लॅटफोर्म आणि प्रेरित सैन्याच्या मदतीने कोणत्याही वातावरणात ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित आणि तयार राहतं.

भारताच्या कठोर भूमिकेपुढे चीनने नरमाईची भूमिका घेतली. पुर्व लडाखमध्ये ज्याठिकाणी संघर्ष झाला तेथून चिनी सैन्य मागे हटण्यासाठी मान्य झालं. पण भारत चीनवर विश्वास ठेऊ इच्छित नाही त्यासाठी भारताने तयारी सुरुच ठेवली आहे.

भारताचं सामर्थ्य असलेली वायूसेना यासाठी पूर्ण ताकदीनिशी सीमेवर ऑपरेशन करत आहे. एअरफोर्सचे अपाचे अटॅक हेलिकॉप्टर सीमेवरील फॉरवर्ड एअरबेसवर ऑपरेशन करताना दिसून आलं. इतकचं नाही तर मिग २९ फायटर एअरक्राफ्ट आणि चिनूक हेवीलिफ्ट हेलिकॉप्टरही नाइट ऑपरेशनमध्ये सहभागी झालं.

दरम्यान, चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमावर भारताने पूल बांधण्यास सुरुवात केली. तथापि, १५ जूनचा हिंसक संघर्ष या घटनेशी संबंधित नाही. कारण ६१ वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची भारतीय सैन्याला पूर्ण माहिती होती. वास्तविक, १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांपासून येथे दोन्ही सैन्यात संघर्ष झाला नाही. पण एप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला त्यावर ६१ वर्षापूर्वी  सहमती झाली होती. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची बातमी आली तेव्हा १९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या वृत्तपत्राचं शीर्षक असं होतं- 'चीन सैन्य गलवान पोस्टमधून मागे हटणार, दिल्लीच्या इशाऱ्याचा परिणाम दिसून येत असल्याचेही लिहिले गेले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावindian air forceभारतीय हवाई दलchinaचीन