शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

India China FaceOff: भारतीय वायूसेनेचा चीनला दणका; सीमेवर लढाऊ विमानांचं ‘नाईट ऑपरेशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 11:33 IST

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे.

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेने मिग १९ लढाऊ विमान आणि चिनूनक हैवीलिफ्ट विमान सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर नाईट ऑपरेशन केले. गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला.

भारताने सीमेनजीक अतिरिक्त सैन्य बळ वाढवलं आहे तसेच लष्कराने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वायूदलानेही लढाऊ विमानं सीमेजवळील एअरबेसवर तैनात केली आहे.

याबाबत ज्येष्ठ लढाऊ पायलट ग्रुप कॅप्टन ए राठी म्हणाले की, नाइट ऑपरेशन हे एखाद्या सरप्राइज सारखं असतं, ज्यामुळे वायूसेना आधुनिक प्लॅटफोर्म आणि प्रेरित सैन्याच्या मदतीने कोणत्याही वातावरणात ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित आणि तयार राहतं.

भारताच्या कठोर भूमिकेपुढे चीनने नरमाईची भूमिका घेतली. पुर्व लडाखमध्ये ज्याठिकाणी संघर्ष झाला तेथून चिनी सैन्य मागे हटण्यासाठी मान्य झालं. पण भारत चीनवर विश्वास ठेऊ इच्छित नाही त्यासाठी भारताने तयारी सुरुच ठेवली आहे.

भारताचं सामर्थ्य असलेली वायूसेना यासाठी पूर्ण ताकदीनिशी सीमेवर ऑपरेशन करत आहे. एअरफोर्सचे अपाचे अटॅक हेलिकॉप्टर सीमेवरील फॉरवर्ड एअरबेसवर ऑपरेशन करताना दिसून आलं. इतकचं नाही तर मिग २९ फायटर एअरक्राफ्ट आणि चिनूक हेवीलिफ्ट हेलिकॉप्टरही नाइट ऑपरेशनमध्ये सहभागी झालं.

दरम्यान, चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमावर भारताने पूल बांधण्यास सुरुवात केली. तथापि, १५ जूनचा हिंसक संघर्ष या घटनेशी संबंधित नाही. कारण ६१ वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची भारतीय सैन्याला पूर्ण माहिती होती. वास्तविक, १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांपासून येथे दोन्ही सैन्यात संघर्ष झाला नाही. पण एप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला त्यावर ६१ वर्षापूर्वी  सहमती झाली होती. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची बातमी आली तेव्हा १९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या वृत्तपत्राचं शीर्षक असं होतं- 'चीन सैन्य गलवान पोस्टमधून मागे हटणार, दिल्लीच्या इशाऱ्याचा परिणाम दिसून येत असल्याचेही लिहिले गेले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावindian air forceभारतीय हवाई दलchinaचीन