शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

India China FaceOff: भारताच्या ३८००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अवैध कब्जा- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 16:46 IST

India China FaceOff: भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ; राजनाथ यांची ग्वाही

नवी दिल्ली: चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागातला तणाव वाढला आहे. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील तणावपूर्ण स्थितीची माहिती राज्यसभेत दिली. पूर्व लडाखमध्ये आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. सीमेवरील तणाव शांततेच्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न आहे. भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणीचीननं भारताच्या भूमीवर अनधिकृतपणे कब्जा केल्याचं राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं. 'भारताच्या ३८  हजार चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा कब्जा आहे. १९६३ मधील एका तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील ५ हजार १८० चौरस किलोमीटर भारतीय जमीन अवैधपणे चीनला सोपवली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जवळपास ९० हजार चौरस किलोमीटरवर चीननं दावा सांगितला आहे,' अशी माहिती राजनाथ यांनी दिली.पाच कलमी कार्यक्रम राबवा अन्यथा युद्धासाठी तयार राहा, चीनची भारताला धमकी१५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे जवान भिडले. त्यावेळी दोन्ही सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. त्या रात्री नेमकं काय घडलं, याची माहितीदेखील राजनाथ यांनी दिली. '१५ जूनला कर्नल संतोष बाबू यांच्यासह देशाच्या १९ शूर जवानांनी भारताच्या संरक्षणासाठी गलवान खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिलं. आपले पंतप्रधान सैन्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी लडाखला गेले,' असं राजनाथ म्हणाले.हा कसला बहिष्कार?... 1600हून जास्त भारतीय कंपन्यांमध्ये चीनची 7500 कोटींची गुंतवणूकभारत शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवण्यास तयार आहे. तीच भारताची भूमिका आहे. मात्र चीन औपचारिक सीमा मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबद्दल दोन्ही देशांमध्ये एकमत नाही. शांततेसाठी करण्यात आलेल्या करारांचं चीनकडून वारंवार उल्लंघन सुरू आहे, असं राजनाथ सिंह यांनी संसदेला सांगितलं. आम्ही देशाची मान झुकू देणार नाही. कोणीही आमच्यासमोर मान तुकवावी, हे आमचं उद्दिष्ट नाही. पण आम्हीही कोणासमोर मान झुकवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRajnath Singhराजनाथ सिंह