शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारताच्या ३८००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अवैध कब्जा- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 16:46 IST

India China FaceOff: भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ; राजनाथ यांची ग्वाही

नवी दिल्ली: चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागातला तणाव वाढला आहे. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील तणावपूर्ण स्थितीची माहिती राज्यसभेत दिली. पूर्व लडाखमध्ये आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. सीमेवरील तणाव शांततेच्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न आहे. भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणीचीननं भारताच्या भूमीवर अनधिकृतपणे कब्जा केल्याचं राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं. 'भारताच्या ३८  हजार चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा कब्जा आहे. १९६३ मधील एका तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील ५ हजार १८० चौरस किलोमीटर भारतीय जमीन अवैधपणे चीनला सोपवली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जवळपास ९० हजार चौरस किलोमीटरवर चीननं दावा सांगितला आहे,' अशी माहिती राजनाथ यांनी दिली.पाच कलमी कार्यक्रम राबवा अन्यथा युद्धासाठी तयार राहा, चीनची भारताला धमकी१५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे जवान भिडले. त्यावेळी दोन्ही सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. त्या रात्री नेमकं काय घडलं, याची माहितीदेखील राजनाथ यांनी दिली. '१५ जूनला कर्नल संतोष बाबू यांच्यासह देशाच्या १९ शूर जवानांनी भारताच्या संरक्षणासाठी गलवान खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिलं. आपले पंतप्रधान सैन्याचं मनोधैर्य उंचावण्यासाठी लडाखला गेले,' असं राजनाथ म्हणाले.हा कसला बहिष्कार?... 1600हून जास्त भारतीय कंपन्यांमध्ये चीनची 7500 कोटींची गुंतवणूकभारत शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवण्यास तयार आहे. तीच भारताची भूमिका आहे. मात्र चीन औपचारिक सीमा मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबद्दल दोन्ही देशांमध्ये एकमत नाही. शांततेसाठी करण्यात आलेल्या करारांचं चीनकडून वारंवार उल्लंघन सुरू आहे, असं राजनाथ सिंह यांनी संसदेला सांगितलं. आम्ही देशाची मान झुकू देणार नाही. कोणीही आमच्यासमोर मान तुकवावी, हे आमचं उद्दिष्ट नाही. पण आम्हीही कोणासमोर मान झुकवणार नाही, अशा शब्दांत त्यांनी चीनला अप्रत्यक्ष इशारा दिला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRajnath Singhराजनाथ सिंह