शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

India China Face Off: मोदी यांनी सत्य परिस्थिती देशाला सांगावी; विरोधकांची जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 03:00 IST

विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांवरून सगळे विरोधक एका स्वरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्न विचारत आहेत. विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले. मोदी म्हणाले की, तरीही आम्हाला शांतता हवी आहे.मोदी यांच्या या वक्तव्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. त्यांनी म्हटले की, मोदी यांंनी हे स्पष्टपणे हे देशाला सांगावे की, सीमेवर परिस्थिती काय आहे? त्या आधी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी यांना विचारले होते की, चीनने आमच्या भूभागावर ताबा कसा मिळवला? २० जवानांचे हौतात्म्य का झाले? घटनास्थळी आज काय परिस्थिती आहे? आमचे सैन्य अधिकारी आणि जवान अजूनही बेपत्ता आहेत का? किती सैनिक गंभीर जखमी झाले आहेत? चीनने भारताच्या कोणत्या भूभागावर ताबा मिळवला, याची उत्तरे सरकारने द्यावीत.मोदी यांच्या वक्तव्यानंतरही काँगे्रस विचारत आहे की, जे प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले त्यांचे मोदी यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सूत्रांनुसार सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन याच प्रश्नांची उत्तरे सरकारकडे मागेल.लडाख प्रकरणावरून मंगळवारपासूनच सरकार प्रश्नांनी घेरले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सकाळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मोदी यांना विचारले की ‘पंतप्रधान गप्प का आहेत, ते लपून का बसले आहेत, फार झाले, काय झाले हे आम्हाला माहिती करून घ्यायचे आहे.’चीनने कशी हिंमत केली की, आमचे जवान मृत्यू पावले. त्याची हिंमत कशी झाली की, आमची जमीन त्याने कब्ज्यात घेतली? राहुल यांनी मोदी यांच्या मौनावर प्रश्न विचारल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही म्हटले की, सरकारला प्रश्न विचारावेत तर त्याला राष्ट्रविरोधी घोषित केले जाते. पंतप्रधानांनी हे सांगायला हवे की, परिस्थिती काय आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी शहीद झालेल्या सैनिकांबद्दल सहवेदना व्यक्त करताना म्हटले की, सीमेवर काय परिस्थिती आहे, हे कोणालाच माहिती नाही व सरकारही त्याविषयी सांगत नाही. त्यांचे थेट लक्ष्य होते ते मोदी यांनी मौन सोडावे. माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांनी सरकारला विचारले की, जेव्हा वाद कमी करण्याचा प्रयत्न होत होता, तर आमचे सैनिक कसे मारले गेले? देशाचे हित यात आहे की, मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी प्रामाणिकपणे वस्तुस्थिती देशाला सांगावी.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोने औपचारिक निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी केली की, पूर्व लडाखमधील घटनाक्रमावर पूर्ण जबाबदारीने निवेदन केले जावे. पक्षाने सरकारने बाळगलेल्या मौनावरही प्रश्न विचारला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘आमची धरणी माता, आमचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. आमचे जवान शहीद होत असताना आम्ही गप्प बसून राहावे? भारतीय जनतेला सत्य समजलेच पाहिजे.’ काँग्रेसच्या अध्यक्षांकडून पक्षाने औपचारिक निवेदन जारी करून देशाच्या अखंडतेसाठी काँग्रेस सरकारसोबत उभी आहे; परंतु मोदी यांनी सत्य सांगितले पाहिजे. सगळ्यांना विश्वासातही घेतले पाहिजे, असे त्यात म्हटले.शहीद झालेले जवानकर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (हैदराबाद), नायब सुभेदार नुदुराम सोरेन (मयूरभंज), नायब सुभेदार मनदीप सिंग (पटियाला), नायब सुभेदार सतनाम सिंग (गुरुदासपूर), हवालदार के. पलानी (मदुराई), हवालदार सुनील कुमार (पाटणा), हवालदार बिपुल राय (मेरठ शहर), जवान दीपक कुमार (रेवा), राजेश ओरांग (बिरघुम), कुंदन कुमार ओझा (साहिबगंज), गणेश राम (कांकेर), चंद्रकांत प्रधान (कंधामल), अंकुश (हमीरपूर), गुरबिंदर (संगरूर), गुरतेज सिंग (मानसा), चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (सहारसा), अमन कुमार (समस्तीपूर), जय किशोर सिंह (वैशाली), गणेश हंसदा (पूर्व सिंघभूम)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी