शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

India China Face Off: मोदी यांनी सत्य परिस्थिती देशाला सांगावी; विरोधकांची जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 03:00 IST

विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांवरून सगळे विरोधक एका स्वरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्न विचारत आहेत. विरोधकांच्या प्रचंड दबाबानंतर मोदी यांनी सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व भारत योग्य त्या कारवाईसाठी पूर्णपणे सक्षम आहे, असे म्हटले. मोदी म्हणाले की, तरीही आम्हाला शांतता हवी आहे.मोदी यांच्या या वक्तव्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. त्यांनी म्हटले की, मोदी यांंनी हे स्पष्टपणे हे देशाला सांगावे की, सीमेवर परिस्थिती काय आहे? त्या आधी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी यांना विचारले होते की, चीनने आमच्या भूभागावर ताबा कसा मिळवला? २० जवानांचे हौतात्म्य का झाले? घटनास्थळी आज काय परिस्थिती आहे? आमचे सैन्य अधिकारी आणि जवान अजूनही बेपत्ता आहेत का? किती सैनिक गंभीर जखमी झाले आहेत? चीनने भारताच्या कोणत्या भूभागावर ताबा मिळवला, याची उत्तरे सरकारने द्यावीत.मोदी यांच्या वक्तव्यानंतरही काँगे्रस विचारत आहे की, जे प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले त्यांचे मोदी यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सूत्रांनुसार सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन याच प्रश्नांची उत्तरे सरकारकडे मागेल.लडाख प्रकरणावरून मंगळवारपासूनच सरकार प्रश्नांनी घेरले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सकाळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मोदी यांना विचारले की ‘पंतप्रधान गप्प का आहेत, ते लपून का बसले आहेत, फार झाले, काय झाले हे आम्हाला माहिती करून घ्यायचे आहे.’चीनने कशी हिंमत केली की, आमचे जवान मृत्यू पावले. त्याची हिंमत कशी झाली की, आमची जमीन त्याने कब्ज्यात घेतली? राहुल यांनी मोदी यांच्या मौनावर प्रश्न विचारल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही म्हटले की, सरकारला प्रश्न विचारावेत तर त्याला राष्ट्रविरोधी घोषित केले जाते. पंतप्रधानांनी हे सांगायला हवे की, परिस्थिती काय आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी शहीद झालेल्या सैनिकांबद्दल सहवेदना व्यक्त करताना म्हटले की, सीमेवर काय परिस्थिती आहे, हे कोणालाच माहिती नाही व सरकारही त्याविषयी सांगत नाही. त्यांचे थेट लक्ष्य होते ते मोदी यांनी मौन सोडावे. माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांनी सरकारला विचारले की, जेव्हा वाद कमी करण्याचा प्रयत्न होत होता, तर आमचे सैनिक कसे मारले गेले? देशाचे हित यात आहे की, मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी प्रामाणिकपणे वस्तुस्थिती देशाला सांगावी.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोने औपचारिक निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी केली की, पूर्व लडाखमधील घटनाक्रमावर पूर्ण जबाबदारीने निवेदन केले जावे. पक्षाने सरकारने बाळगलेल्या मौनावरही प्रश्न विचारला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘आमची धरणी माता, आमचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. आमचे जवान शहीद होत असताना आम्ही गप्प बसून राहावे? भारतीय जनतेला सत्य समजलेच पाहिजे.’ काँग्रेसच्या अध्यक्षांकडून पक्षाने औपचारिक निवेदन जारी करून देशाच्या अखंडतेसाठी काँग्रेस सरकारसोबत उभी आहे; परंतु मोदी यांनी सत्य सांगितले पाहिजे. सगळ्यांना विश्वासातही घेतले पाहिजे, असे त्यात म्हटले.शहीद झालेले जवानकर्नल बिकुमल्ला संतोष बाबू (हैदराबाद), नायब सुभेदार नुदुराम सोरेन (मयूरभंज), नायब सुभेदार मनदीप सिंग (पटियाला), नायब सुभेदार सतनाम सिंग (गुरुदासपूर), हवालदार के. पलानी (मदुराई), हवालदार सुनील कुमार (पाटणा), हवालदार बिपुल राय (मेरठ शहर), जवान दीपक कुमार (रेवा), राजेश ओरांग (बिरघुम), कुंदन कुमार ओझा (साहिबगंज), गणेश राम (कांकेर), चंद्रकांत प्रधान (कंधामल), अंकुश (हमीरपूर), गुरबिंदर (संगरूर), गुरतेज सिंग (मानसा), चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (सहारसा), अमन कुमार (समस्तीपूर), जय किशोर सिंह (वैशाली), गणेश हंसदा (पूर्व सिंघभूम)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी