शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

India China Conflict: भारताच्या जवानांनी चिनी सैन्याला लाठ्याकाठ्यांनी हाणले, पळवून लावले; व्हायरल व्हिडीओची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 09:36 IST

India China Conflict: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे

नवी दिल्ली - आधीच तणावपूर्ण असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले आहे. ९ डिसेंबर रोजी ही हिंसक झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असतानाच या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. तसेच भारतीय जवानांनी इंगा दाखवल्यानंतर घुसखोर चिनी सैनिकांनी पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे. 

भारत आणि चीनच्या जवानांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करण्याचा चीनचा डाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेवरून चिंता व्यक्त होत असतानाच अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या संघर्षाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओला अद्याप लष्कराकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडीओ जुना असल्याचाही दावा केला जात आहे.  मात्र हा व्हिडीओ धडाक्याने व्हायरल होत आहे. भारताच्या जवानांनी घेतलेल्या रुद्रावतारामुळे घुसखोर चिनी सैनिक बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहेत. तर भारताचे जवान त्यांना बडवून काढताना दिसत आहेत.

दरम्यान, ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. चिनी सैनिकांकडे लाठ्या-काठ्याही होत्या. मात्र भारतीय जवानांनी तात्काळ मोर्चेबांधणी केली. यानंतर दोन्ही सैन्यात झटापट झाली. भारतीय सैनिकांचं आक्रमक रुप पाहून चिनी सैनिक मागे हटले. चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचंही पुढे आले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या ६ जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत संसदेत निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणाले की, चिनी सैन्याने ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत माघारी जाण्यास भाग पाडले. या चकमकीत एकाही जवानाचा मृत्यू झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल