शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

India-China Conflict: फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:10 IST

India-China Conflict: चीनकडून भारतावर वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी सरकारने एसओपी जारी केला आहे.

India-China Conflict: 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. चीनकडून सीमेवर घुसखोरीची कारवाई अनेकदा सुरू असते. यासोबतच चीनकडून भारतातील इंटरनेट व्यवस्थेवर सायबर हल्ले होत असतात. अलीकडेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(एम्स)चा सर्व्हर हॅक झाला होता. हा चीनचा कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. या संस्थेतील महत्त्वाच्या लोकांचा डेटा त्यांनी डार्क वेबवर टाकला होता.

सरकारकडून SOP जारीचीनचा हा उद्दामपणा पाहून भारतही सतर्क झाला आहे. अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, त्यांनी आपल्या मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) च्या कर्मचार्‍यांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल-एसओपी जारी केला आहे. याचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

SOP म्हणजे काय?स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल म्हणजे काही काम करण्याचे मानक किंवा मान्यताप्राप्त मार्ग. चीनकडून सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्यांचा सामना करणाऱ्या भारताने इंटरनेट आणि कॉम्प्युटर वापरण्याच्या योग्य किंवा प्रमाणित पद्धतींबाबत ही SOP जारी केली आहे. केंद्र सरकारने आपली भूमिका मजबूत करण्यासाठी आणि मोठे नुकसान टाळण्यासाठी कडक देखरेखीसाठी अशी पावले उचलली आहेत.

ही कामे करावी लागतीलया अंतर्गत, सरकारने विविध मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) मधील कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळण्यास सांगितले आहे. यामध्ये मूलभूत आयटी कायदे लक्षात ठेवणे, वापरल्यानंतर संगणक बंद करणे, ईमेल साइन आउट करणे, वेळोवेळी पासवर्ड अपडेट करणे यांचा समावेश आहे.

...तर कारवाई होणारया प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्सनुसार, एम्समध्ये सायबर हल्ल्याचे मुख्य कारण एका कर्मचाऱ्याने येथे अशी खबरदारी घेण्यात निष्काळजीपणा दाखवल्याचे समोर आले आहे. एम्समधील कर्मचारी सहसा त्यांचे संगणक बंद करत नाहीत किंवा त्यांच्या ईमेल खात्यातून साइन आउट करत नाहीत. त्यामुळे हॅकर्सना एम्सच्या सर्व्हरवर हल्ला करण्याची संधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcyber crimeसायबर क्राइम