शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

सीमारेषेवर शांततेसाठी भारत - चीन सहमत

By admin | Updated: June 8, 2014 18:02 IST

सीमा रेषेसंदर्भातील वाद निकाली निघेपर्यंत सीमा रेषेवर 'जैसे थे' स्थिती ठेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि.८-  सीमा रेषेसंदर्भातील वाद निकाली निघेपर्यंत सीमा रेषेवर 'जैसे थे' स्थिती ठेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या चर्चेत हा सकारात्मक पवित्रा घेतला आहे.  
भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई हे रविवारी दोन दिवसाच्या भारत दौ-यावर आले आहेत. नवीन सरकारसोबत राजनैतिक संबंध निर्माण करुन दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रविवारी वांग ई यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत त्यांनी सीमा रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. या भेटीत वांग ई यांनी भारतासोबत व्यापार, गुंतवणूकीवरही चर्चा केली.  मात्र सीमारेषेसंदर्भात यापूर्वीही चीनने शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका घेतली होती. मात्र यानंतरही चीनने सीमारेषेवरील कुरापती सुरुच ठेवल्या होत्या याकडे भारत - चीनसंबंधांविषयीचे जाणकार लक्ष वेधतात. 
दरम्यान, वांग ई उद्या (सोमवारी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटणार आहेत.