शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

भारतातल्या 'या' राज्यात भुताच्या भीतीने अख्खं गाव झालं रिकामं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 13:34 IST

भूत नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीय. तरीही गावी गेल्यावर भुतांच्या गोष्टी मोठया चवीने चघळल्या जातात. भारतातल्या काही गावखेडयांमध्ये भुताची दहशत आजही कायम आहे.

हैदराबाद - भूत नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीय. तरीही गावी गेल्यावर भुतांच्या गोष्टी मोठया चवीने चघळल्या जातात. भारतातल्या काही गावखेडयांमध्ये भुताची दहशत आजही कायम आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तेलंगणच्या निर्मल जिल्ह्यात कासीगुडा हे अख्ख गाव भूताच्या दहशतीने रिकामी झालं आहे. रात्रीच्या सुमारास एका महिलेचे भूत गावात भटकते असा इथल्या गावक-यांचा समज झाला आहे. या महिला भूताच्या दहशतीने संपूर्ण गाव ओस पडले आहे. 

हे भूत फक्त पुरुषांना टार्गेट करते असा इथल्या गावक-यांचा दावा आहे. या गावचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कासीगुडा गावात एकूण 60 कुटुंबे राहतात. दगड फोडणे हा या गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावकरी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात घर सोडून गेल्याने संपूर्ण गावात सन्नाटा पसरलेला दिसेल. 

गावातील बहुतांश घरांना टाळी लागलेली असून कोणाचीही घरी परतण्याची हिम्मत नाही. जे गावकरी अजूनही गावात राहतायत ते अंधार पडण्यापूर्वी घरी परततात. सूर्य उगवण्यापूर्वी कोणीही घराच्या बाहेर पडत नाही. तेलंगणमधल्या अनेक गावांमध्ये भुतांची दहशत आहे पण प्रथमच गावकरी मोठया संख्येने गाव सोडून गेल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.