शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 08:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी; हवामान बदलासंदर्भातही ठोस कृती; विकसित भारत घडविण्याकडे वाटचाल

नवी दिल्ली : भाजपप्रणित एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही, तर हवामान बदलासंदर्भात ठोस कृती करण्यासारख्या महत्त्वपूर्ण जागतिक प्रश्नांवरही प्रभावी कामगिरी केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या  सरकारला सत्तेवर येऊन सोमवारी ११ वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने सामाजिक न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत.  वंचित समूहांचे इतक्या प्रमाणात प्रतिनिधीत्व आजवर कधीही केंद्रीय मंत्रिमंडळात दिसले नव्हते.

एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

मोदी यांनी लिहिले आहे की, १४० कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने आणि सामूहिक सहभागातून भारताने गेल्या ११ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या तत्त्वानुसार सरकारने अनेक मूलगामी बदल घडवून आणले. त्यात आर्थिक प्रगतीपासून ते सामाजिक उत्थानापर्यंत या सरकारने अनेक उत्तम कामे केली. तसेच, विकसित भारत घडविण्याच्या दृष्टीने आता आम्ही पावले उचलली आहेत.

कार्यकाळाची इतिहासात नोंद होणार सुवर्णाक्षरांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ११ वर्षांत देशात घडविलेल्या सकारात्मक बदलांमुळे या कार्यकाळाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला लोकाभिमुख बनविले. भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविण्याइतक्या जागा जिंकता आल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारताची’ पायाभरणी झाली असे ते म्हणाले.

११ वर्षांत मोदी सरकारने नेमके काय केले?

८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.

१५ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाने पाणी पोहोचले आह;.

४ कोटी घरे गरिबांसाठी घरे बांधण्यात आली.

१२ कोटी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

६८ लाख फेरीवाल्यांना कर्ज मिळाले.

५२.५ कोटी लघुउद्योजकांना कर्जवाटप झाले आहे.

२० कोटी महिलांना विविध योजनांतर्गत रोख स्वरूपात कोरोना काळात मदत करण्यात आली.

१२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर.

२०१४ मध्ये देशात आली होती शिथिलता, पण...

मोदी सरकारने जनहितासाठी काम केले. भारत आपले सार्वभौमत्व व सीमेच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

लोक जनशक्ती पार्टीचे नेते  चिराग पासवान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, देशाने नव्या आर्थिक पुनरुत्थानाच्या, सामाजिक न्यायाच्या युगात प्रवेश केला आहे.

२०१४ मध्ये देशात सर्व बाबतीत शिथिलता आली होती. मोदींच्या नेतृत्वाखालील भारत ‘सुधारणा, कार्यक्षमता आणि परिवर्तन’ या त्रिसूत्रीच्या बळावर आत्मनिर्भरता आणि विकासाकडे वेगाने वाटचाल करत

आहे, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी