शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 08:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी; हवामान बदलासंदर्भातही ठोस कृती; विकसित भारत घडविण्याकडे वाटचाल

नवी दिल्ली : भाजपप्रणित एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही, तर हवामान बदलासंदर्भात ठोस कृती करण्यासारख्या महत्त्वपूर्ण जागतिक प्रश्नांवरही प्रभावी कामगिरी केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या  सरकारला सत्तेवर येऊन सोमवारी ११ वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने सामाजिक न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत.  वंचित समूहांचे इतक्या प्रमाणात प्रतिनिधीत्व आजवर कधीही केंद्रीय मंत्रिमंडळात दिसले नव्हते.

एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

मोदी यांनी लिहिले आहे की, १४० कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने आणि सामूहिक सहभागातून भारताने गेल्या ११ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या तत्त्वानुसार सरकारने अनेक मूलगामी बदल घडवून आणले. त्यात आर्थिक प्रगतीपासून ते सामाजिक उत्थानापर्यंत या सरकारने अनेक उत्तम कामे केली. तसेच, विकसित भारत घडविण्याच्या दृष्टीने आता आम्ही पावले उचलली आहेत.

कार्यकाळाची इतिहासात नोंद होणार सुवर्णाक्षरांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ११ वर्षांत देशात घडविलेल्या सकारात्मक बदलांमुळे या कार्यकाळाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला लोकाभिमुख बनविले. भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविण्याइतक्या जागा जिंकता आल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारताची’ पायाभरणी झाली असे ते म्हणाले.

११ वर्षांत मोदी सरकारने नेमके काय केले?

८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.

१५ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाने पाणी पोहोचले आह;.

४ कोटी घरे गरिबांसाठी घरे बांधण्यात आली.

१२ कोटी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

६८ लाख फेरीवाल्यांना कर्ज मिळाले.

५२.५ कोटी लघुउद्योजकांना कर्जवाटप झाले आहे.

२० कोटी महिलांना विविध योजनांतर्गत रोख स्वरूपात कोरोना काळात मदत करण्यात आली.

१२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर.

२०१४ मध्ये देशात आली होती शिथिलता, पण...

मोदी सरकारने जनहितासाठी काम केले. भारत आपले सार्वभौमत्व व सीमेच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

लोक जनशक्ती पार्टीचे नेते  चिराग पासवान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, देशाने नव्या आर्थिक पुनरुत्थानाच्या, सामाजिक न्यायाच्या युगात प्रवेश केला आहे.

२०१४ मध्ये देशात सर्व बाबतीत शिथिलता आली होती. मोदींच्या नेतृत्वाखालील भारत ‘सुधारणा, कार्यक्षमता आणि परिवर्तन’ या त्रिसूत्रीच्या बळावर आत्मनिर्भरता आणि विकासाकडे वेगाने वाटचाल करत

आहे, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी