शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: February 12, 2016 23:02 IST

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. १२ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.
भारताने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सुरुवातीलाच श्रीलंकेला दोन धक्के बसले. फलंदाज तिलकरत्ने दिलशान शून्य धावेवर बाद झाला, तर धनुष्का गुणतिलका अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला सीकुगे प्रसन्ना सुद्धा तीन धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या संघाला मधल्या फळीतील फलंदाजानी सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. श्रीलंकेने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. चमारा कापुगेदाराने सर्वाधिक ३२ धावा केल्या.  
भारताचा गोलंदाज आर. अश्विनने सर्वाधिक जास्त तीन बळी घेतले, तर आशिष नेहरा, जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
भारताकडून शिखर धवनची २५ चेंडूतील ५१ धावांची अर्धशतकी खेळी, रोहित शर्माच्या ४३ धावा त्यानंतर अजिंक्य रहाणे २५, सुरेश रैना ३०, हार्दिक पंडया २७ यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या टी-२० सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.  
भारताने निर्धारित वीस षटकात सहाबाद १९६ धावा केल्या. आजच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अवघ्या सात षटकात ७५ धावांची सलामी दिली.  
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मागच्या चूकांपासून धडा घेतल्याचे दिसून आले. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा कर्णधार चंडीमलचा निर्णय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. १२ षटकात भारताच्या एक बाद ११० धावा झाल्या होत्या. शानदार अर्धशतक झळकवल्यानंतर ७५ धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला.  
धवनने २५ चेंडूत ५१ धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुसरा सामना भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर होत आहे. भारताने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही. श्रीलंकेने तिल्करत्न दिलशानला संघात स्थान दिले आहे.  
ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरीमुळे भारतीय संघ श्रीलंकेच्या अनुनभवी युवा संघाला सहज नमवेल असे वाटत होते. मात्र श्रीलंकेच्या युवा वेगवान गोलंदाजांनी पुण्याच्या गवत असलेल्या खेळपट्टीचा अचूक फायदा उचलला आणि भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा दणका दिला. सध्या या मालिकेत श्रीलंका १-० ने आघाडीवर आहे.