शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: February 12, 2016 23:02 IST

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. १२ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.
भारताने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सुरुवातीलाच श्रीलंकेला दोन धक्के बसले. फलंदाज तिलकरत्ने दिलशान शून्य धावेवर बाद झाला, तर धनुष्का गुणतिलका अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला सीकुगे प्रसन्ना सुद्धा तीन धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या संघाला मधल्या फळीतील फलंदाजानी सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. श्रीलंकेने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. चमारा कापुगेदाराने सर्वाधिक ३२ धावा केल्या.  
भारताचा गोलंदाज आर. अश्विनने सर्वाधिक जास्त तीन बळी घेतले, तर आशिष नेहरा, जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
भारताकडून शिखर धवनची २५ चेंडूतील ५१ धावांची अर्धशतकी खेळी, रोहित शर्माच्या ४३ धावा त्यानंतर अजिंक्य रहाणे २५, सुरेश रैना ३०, हार्दिक पंडया २७ यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या टी-२० सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.  
भारताने निर्धारित वीस षटकात सहाबाद १९६ धावा केल्या. आजच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अवघ्या सात षटकात ७५ धावांची सलामी दिली.  
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मागच्या चूकांपासून धडा घेतल्याचे दिसून आले. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा कर्णधार चंडीमलचा निर्णय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. १२ षटकात भारताच्या एक बाद ११० धावा झाल्या होत्या. शानदार अर्धशतक झळकवल्यानंतर ७५ धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला.  
धवनने २५ चेंडूत ५१ धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुसरा सामना भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर होत आहे. भारताने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही. श्रीलंकेने तिल्करत्न दिलशानला संघात स्थान दिले आहे.  
ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरीमुळे भारतीय संघ श्रीलंकेच्या अनुनभवी युवा संघाला सहज नमवेल असे वाटत होते. मात्र श्रीलंकेच्या युवा वेगवान गोलंदाजांनी पुण्याच्या गवत असलेल्या खेळपट्टीचा अचूक फायदा उचलला आणि भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा दणका दिला. सध्या या मालिकेत श्रीलंका १-० ने आघाडीवर आहे.