शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: February 12, 2016 23:02 IST

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. १२ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.
भारताने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सुरुवातीलाच श्रीलंकेला दोन धक्के बसले. फलंदाज तिलकरत्ने दिलशान शून्य धावेवर बाद झाला, तर धनुष्का गुणतिलका अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला सीकुगे प्रसन्ना सुद्धा तीन धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या संघाला मधल्या फळीतील फलंदाजानी सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. श्रीलंकेने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. चमारा कापुगेदाराने सर्वाधिक ३२ धावा केल्या.  
भारताचा गोलंदाज आर. अश्विनने सर्वाधिक जास्त तीन बळी घेतले, तर आशिष नेहरा, जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
भारताकडून शिखर धवनची २५ चेंडूतील ५१ धावांची अर्धशतकी खेळी, रोहित शर्माच्या ४३ धावा त्यानंतर अजिंक्य रहाणे २५, सुरेश रैना ३०, हार्दिक पंडया २७ यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या टी-२० सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.  
भारताने निर्धारित वीस षटकात सहाबाद १९६ धावा केल्या. आजच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अवघ्या सात षटकात ७५ धावांची सलामी दिली.  
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मागच्या चूकांपासून धडा घेतल्याचे दिसून आले. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा कर्णधार चंडीमलचा निर्णय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. १२ षटकात भारताच्या एक बाद ११० धावा झाल्या होत्या. शानदार अर्धशतक झळकवल्यानंतर ७५ धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला.  
धवनने २५ चेंडूत ५१ धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुसरा सामना भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर होत आहे. भारताने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही. श्रीलंकेने तिल्करत्न दिलशानला संघात स्थान दिले आहे.  
ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरीमुळे भारतीय संघ श्रीलंकेच्या अनुनभवी युवा संघाला सहज नमवेल असे वाटत होते. मात्र श्रीलंकेच्या युवा वेगवान गोलंदाजांनी पुण्याच्या गवत असलेल्या खेळपट्टीचा अचूक फायदा उचलला आणि भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा दणका दिला. सध्या या मालिकेत श्रीलंका १-० ने आघाडीवर आहे.