शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय

By admin | Updated: February 12, 2016 23:02 IST

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.

ऑनलाइन लोकमत

रांची, दि. १२ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर दुस-या सामन्यात श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिऴविला.
भारताने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सुरुवातीलाच श्रीलंकेला दोन धक्के बसले. फलंदाज तिलकरत्ने दिलशान शून्य धावेवर बाद झाला, तर धनुष्का गुणतिलका अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला सीकुगे प्रसन्ना सुद्धा तीन धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या संघाला मधल्या फळीतील फलंदाजानी सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. श्रीलंकेने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. चमारा कापुगेदाराने सर्वाधिक ३२ धावा केल्या.  
भारताचा गोलंदाज आर. अश्विनने सर्वाधिक जास्त तीन बळी घेतले, तर आशिष नेहरा, जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
भारताकडून शिखर धवनची २५ चेंडूतील ५१ धावांची अर्धशतकी खेळी, रोहित शर्माच्या ४३ धावा त्यानंतर अजिंक्य रहाणे २५, सुरेश रैना ३०, हार्दिक पंडया २७ यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या टी-२० सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.  
भारताने निर्धारित वीस षटकात सहाबाद १९६ धावा केल्या. आजच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अवघ्या सात षटकात ७५ धावांची सलामी दिली.  
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मागच्या चूकांपासून धडा घेतल्याचे दिसून आले. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा कर्णधार चंडीमलचा निर्णय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. १२ षटकात भारताच्या एक बाद ११० धावा झाल्या होत्या. शानदार अर्धशतक झळकवल्यानंतर ७५ धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला.  
धवनने २५ चेंडूत ५१ धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुसरा सामना भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर होत आहे. भारताने आपल्या संघात एकही बदल केलेला नाही. श्रीलंकेने तिल्करत्न दिलशानला संघात स्थान दिले आहे.  
ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरीमुळे भारतीय संघ श्रीलंकेच्या अनुनभवी युवा संघाला सहज नमवेल असे वाटत होते. मात्र श्रीलंकेच्या युवा वेगवान गोलंदाजांनी पुण्याच्या गवत असलेल्या खेळपट्टीचा अचूक फायदा उचलला आणि भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचा दणका दिला. सध्या या मालिकेत श्रीलंका १-० ने आघाडीवर आहे.