शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

भारत, बांगलादेशचा नकाशा बदलला

By admin | Updated: August 1, 2015 05:14 IST

खग्राबारी (बांगलादेश) - भारत व बांगलादेश यांच्यातील परस्परांना जमिनी परत करण्याचा ऐतिहासिक करार शुक्रवारी मध्यरात्री प्रत्यक्षात येणार असून, यामुळे गेली ७० वर्षांचा सीमावाद संपणार आहे.

ढाला : खग्राबारी (बांगलादेश) - भारत व बांगलादेश यांच्यातील परस्परांना जमिनी परत करण्याचा ऐतिहासिक करार शुक्रवारी मध्यरात्री प्रत्यक्षात येणार असून, यामुळे गेली ७० वर्षांचा सीमावाद संपणार आहे. याप्रसंगी१६२ गावांचे विभाजन होणार असून, भारतातील ५१ गावे तर बांगलादेशातील १११ गावे यांचे पुनर्वाटप होणार आहे. जूनमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार हे विभाजन होत आहे. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर एक मिनिटाने हे विभाजन होईल. दोन्ही देशांचे अधिकारी आपापल्या सीमेवर ध्वजारोहण करतील. त्यानंतर दोन्ही देशातील गावांभोवती असणारी दुसऱ्या देशाची गावे परस्परांना दिली जातील व तिथे राहणाऱ्या ५० हजार नागरिकांना नागरिकत्वाचे फायदे मिळू शकतील. या अंतर्गत शाळा, ऊर्जा पुरवठा व आरोग्य सेवा या सुविधा या नागरिकांना उपलब्ध होतील. १९४७ पासून हे नागरिक कोणत्याही सुविधेशिवाय गुजारा करत होते. परस्परांना गावे देण्याच्या अंतिम प्रहरात नागरिक एकमेकांना मेजवान्या देत असून, ज्या देशात जाणार त्या देशाचे राष्ट्रगीत पाठ करत आहेत. भारतात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे दुखवटा चालू आहे, त्यामुळे या मेजवान्यांचे स्वरूप थोडेसे साधेसुधे आहे. मध्यरात्रीचा प्रहर होताच या भूभागात ६८ मेणबत्या पेटविल्या जातील. ब्रिटिश राज्य संपल्यानंतरची ६८ वर्षे या लोकांनी बिनसरकारी अवस्थेत घालविली आहेत, त्याचे हे प्रतीक आहे. अनुभव हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा समारंभ आहे. मला काय वाटते आहे हे मी सांगू शकत नाही असे पारुल खातुन (३५) या भारतीय खेडे कोट बाजनीत येणाऱ्या महिलेने सांगितले. मला आता बांगलादेशी नागरिकाप्रमाणे सुविधा मिळतील असे तिने सांगितले. तिच्याकडे राष्ट्रीयत्वाची ओळख देणारे कार्ड नसल्यामुळे प्रसूती जवळ आलेली असताना तिला बांगलादेशातील रुग्णालयातून हाकलून लावले होते. ही आठवणही तिने जागविली. या गावांची मालकी स्थानिक राजकुमाराने अनेक वर्षांपूर्वी ठरवली होती. १९४७ साली ब्रिटिश राजवट संपल्यानंतर झालेल्या भारत-पाक फाळणीत या गावांचेही विभाजन झाले. १९७१ साली बांगलादेशमुक्ती युद्धातही या गावांना न्याय मिळाला नाही. बांगलादेशाने १९७४ साली या गावांच्या सीमा बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता; पण भारताने त्या करारावर जून २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी केली. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केले. नागरिकांना कोणत्या देशात राहायचे आहे, हा प्रश्न विचारला. बांगलादेशी भागातील नागरिकांनी बांगलादेशातच जाण्याची इच्छा व्यक्त केली. बांगलादेश सीमेअंतर्गत गावातील १ हजार लोकांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. भारतातील बांगलादेशी गावात राहणाऱ्यांनी आपले राष्ट्रीयत्व बदलले आहे. (वृत्तसंस्था)