शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश सीमा बंद करणार

By admin | Updated: March 26, 2016 01:06 IST

आसाममध्ये सत्तेवर आल्यास बांगलादेशातून होणारी स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी या देशासोबतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन भाजपने शुक्रवारी जारी केलेल्या

गुवाहाटी : आसाममध्ये सत्तेवर आल्यास बांगलादेशातून होणारी स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी या देशासोबतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन भाजपने शुक्रवारी जारी केलेल्या ‘व्हिजन डाक्युमेंट’मध्ये दिले आहे. ‘आसाम व्हिजन डाक्युमेंट २०१६-२०२५- सबका साथ सबका विकास’ येथे जारी करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यावर शरसंधान साधले.अनेक दशकांपासून बेकायदेशीररीत्या स्थलांतरित लोक आसाममध्ये वास्तव्याला असून त्यामुळे या राज्यातील लोकसंख्येचा आलेख बिघडला आहे. गोगोई हे घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप जेटली यांनी सदर जाहीरनामा जारी करताना केला.प्रथमच भाजपने आसाममधील बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नाला जाहीरनाम्यात स्थान देत प्रमुख निवडणूक मुद्यांमध्ये समाविष्ट केले आहे. उद्योग, व्यवसाय, लघु आणि मध्यम उद्योग आणि अन्य संस्थांमध्ये घुसखोरांना रोजगार देत असल्यास कठोर कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जेटलींनी स्पष्ट केले. या राज्यात ४ आणि ११ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. (वृत्तसंस्था)अमित शहा यांच्या दोन जाहीर सभा...भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसागर आणि सोनारी येथे दोन जाहीर सभांना संबोधित करताना भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन दिले. गरिबांना मदत करणारे सरकार गोगोई देऊ शकत नाहीत. केवळ भाजपच हे करू शकते. या राज्यातील जनतेने गोगोर्इंना १५ वर्षे सत्ता दिली मात्र हे राज्य जागच्या जागीच आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत हे राज्य कधीही सुरक्षित राहिले नाही, असेही शहा यांनी म्हटले.