शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सायकल, बैलगाडीतून विश्व पाहणाऱ्या 'इस्त्रो'ची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 14:38 IST

1960 साली स्थापन झालेल्या 'इस्त्रो'ने प्रचंड संघर्ष केला

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत अंतराळामध्ये भारतीयाला पाठविण्याची घोषणा केली. भविष्यात हे शक्य झाल्यास भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्रासाठी  (ISRO) हे एक मोठे यश असणार आहे. कारण, इस्त्रोने हा टप्पा गाठण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. 

इस्त्रोने पहिला उपग्रह पाठविण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. एकेकाळी उपग्रह आणि त्याला अवकाशात पाठविण्यासाठी लागणाऱ्या रॉकेटचे सुटे भाग इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी बैलगाड्या आणि सायकलींवरून वाहून नेले होते. इस्त्रोची स्थापना 1960 मध्ये झाली होती. अमेरिकेमध्येही अंतराळात उपग्रह पाठविण्याचे प्रयोग प्राथमिक अवस्थेत होते. अमेरिकेने प्रशांत महासागरात खेळले गेलेल्या टोकिआे ऑलिंपिक खेळांचे थेट प्रसारण केल्यामुळे जगभराचे लक्ष वेधले गेले होते. 

 अमेरिकेच्या सिनकॉम-3 या उपग्रहाने ही किमया साधली होती. यावर प्रभावित होऊन भारताचे अंतराळ मोहिमेचे जनक शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांनी उपग्रहाचे महत्व ओळखले. यानंतर 16 फेब्रुवारी, 1962 ला अणुऊर्जा विभागाने अंतराळ संशोधन राष्ट्रीय समितीची स्थापना केली. यानंतर तुंबा भूमध्य रॉकेट लाँचिंग केंद्राचे काम करायला सुरुवात झाली. 

1963 मध्ये पहिले रॉकेट लाँचयानंतर साधारण वर्षभरातच भारताने आपले पहिलेवहिले रॉकेट लाँच केले. तिरुवनंतपुरम जवळ तुंबा येथे हे केंद्र होते. येथील एका चर्चच्या बाजुलाच असलेल्या फादरच्या घरात कार्यालय बनविण्य़ात आले. तसेच चर्चच्या इमारतीत नियंत्रण कक्ष उघडण्यात आला. 21 नोव्हेंबर, 1963 मध्ये तुंबा येथून सोडलेल्या रॉकेटचे निरीक्षण उघड्या डोळ्यांनी म्हणजेच दुर्बिनीशिवाय केले गेले. रॉकेटमधून निघणाऱ्या धुराद्वारे या रॉकेटचे ट्रॅकिंग केले गेले. यापुर्वी रॉकेटचे सुटे भाग बैलगाडी, सायकलच्या साह्याने लाँच पॅडपर्यंत पोहोचविण्यात आले होते. 

12 वर्षांनी पहिला उपग्रह झेपावलाया दरम्यान बरेच प्रयोग केले गेले. शेवटी एका तपानंतर रशियन रॉकेटच्या सहाय्याने 19 एप्रिल, 1975 ला भारताचा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' अंतराळात झेपावला. यावेळीही इस्त्रोकडे मुलभूत सुविधाही नव्हत्या. बेंगळुरुमध्ये यावेळी स्वच्छतागृहाचे रुपांतर वेळ दाखविणाऱ्या केंद्रामध्ये केले गेले होते. आज आपला देश दुसऱ्या देशांच्या उपग्रहांचे निर्माण करण्याबरोबरच त्यांचे प्रक्षेपणही करतो. एवढी मजल गाठण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अनंत समस्यांचा सामना करावा लागला होता. 

यानंतर इस्त्रोने कधीही मागे वळून पाहिले नाही. 1980 मध्ये पहिल्या स्वदेशी सॅटेलाईट व्हेईकल एसएलव्ही-3 द्वारे रोहिणी उपग्रहाला कक्षेत सोडण्यात आले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह सोडण्यात आला होता. यानंतर भारत अंतराळामध्ये दबदबा असणाऱ्या सहा देशांच्या यादीत विराजमान झाला. 

ऑक्टोबर 2008 मध्ये चंद्रयान मोहिमेने तर इस्त्रोला चार चाँद लावले. चांद्रयान-1 ये यान 2009 पर्यंत कार्यरत होते. महत्वाचे म्हणजे या मोहिमेची घोषणा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 सालच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच केली होती. इस्त्रो यंदा चांद्रयान-2 ला पाठविण्याची तयारी करत आहे.

मंगळयान मोहिमेने उडविली जगाची झोपइस्त्रोच्या मंगळयान मोहिमेने 2013 मध्ये भल्याभल्या शक्तींची झोप उडवली. आशियातून मंगळावर पाऊल ठेवणारी इस्त्रो ही एकमेव. शेजारच्या प्रतिस्पर्धी चीनलाही अद्याप मंगळवारी जमलेली नाही. हे यान 24 सप्टेंबर, 2014 ला मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसisroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी