शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Independence Day 2021: जाणून घ्या, १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी देशात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 14:53 IST

Celebration 15th Auguest 2021: ब्रिटीश सरकारने ब्रिटीश भारताला दोन राज्यात विभाजन करण्याचा विचार ३ जून १९४७ मध्ये स्वीकारला.

ठळक मुद्दे१९४६ मध्ये ब्रिटनच्या लेबर पार्टी सरकारचा आर्थिक खजिना दुसऱ्या महायुद्धानंतर रिकामा झाला होताब्रिटीश सरकार जून १९४८ पासून भारताला पूर्णपणे स्व-अधिकार देईलतत्कालीन पंतप्रधान क्लीमेंट एटली यांनी फेब्रुवारी १९४७ मध्ये घोषणा केली होती.

नवी दिल्ली – १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदा भारत ७५ व्या स्वातंत्र्यदिनी अमृत दिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहित्येत १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी भारतात काय काय झालं? यातील अनेक असे किस्से आहेत जे अनेकांना माहिती नसतील. यात भारत-पाकिस्तान फाळणी, सीमा मोजणी, दंगल आणि माउंटबेटन योजना आणि राजघराणे भारतात विलीन करण्याचा मुख्य समावेश होता.

१९४६ मध्ये ब्रिटनच्या लेबर पार्टी सरकारचा आर्थिक खजिना दुसऱ्या महायुद्धानंतर रिकामा झाला होता. तेव्हा ना घरात लोकांचे समर्थन होतं ना आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन याची जाणीव ब्रिटनला झाली. त्यामुळे ब्रिटन अस्वस्थ झाला होता. त्यामुळे भारतावर नियंत्रण करण्यासाठी असणाऱ्या देशी दलांचा विश्वास उडत चालला होता. फेब्रुवारी १९४७ पंतप्रधान क्लीमेंट एटली यांनी घोषणा केली की, ब्रिटीश सरकार जून १९४८ पासून भारताला पूर्णपणे स्व-अधिकार देईल. त्यानंतर वायसराय लॉर्ड माउंटबेटनने सत्ता हस्तांतरण करण्याची तारीख पुढे ढकलली.

माउंटबेटनला वाटत होतं की, काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे सरकार कोसळू शकतं. सत्ता हस्तातरणाची तारीख दुसऱ्या विश्वयुद्धात जपानने आत्मसमर्पण केल्याला दोन वर्ष झाल्यानं १५ ऑगस्ट निवडली होती. ब्रिटीश सरकारने ब्रिटीश भारताला दोन राज्यात विभाजन करण्याचा विचार ३ जून १९४७ मध्ये स्वीकारला. तसेच दोन्ही सरकारला स्वतंत्र्य अधिकार दिले जातील. त्यांना ब्रिटीश कॉमनवेल्थपासून वेगळे होण्याचा अधिकार येतील अशी घोषणा केली.

स्वातंत्र्यापूर्वीचे ६० दिवस

ब्रिटीश सरकारने ३ जून १९४७ ला भारताच्या विभाजाचा निर्णय घेतला. भारताच्या विभाजनाची योजना माउंटबेटन योजना म्हणून ओळखली जाते. भारत-पाकिस्तानची सीमा रेषा ठरली. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटीश संसदेत भारताला स्वतंत्रता देणारा कायदा पारित झाला. त्यानंतर ५६५ मधील ५५२ राजघराणी स्वच्छेने भारतात समाविष्ट झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्टला वेगळं पाकिस्तान बनवलं.

विभाजनावेळी बंगाल, बिहार आणि पंजाबमध्ये दंगल झाली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यता दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. दंगली रोखण्यासाठी महात्मा गांधी १५ ऑगस्टला बंगालच्या नोआखलीमध्ये उपोषण करत होते. (Happy independence day 2021) लाखो मुस्लीम, सिख आणि हिंदू शरणार्थी स्वातंत्र्यानंतर नवीन सीमेतून पायी प्रवास करत होते. पंजाब ज्याठिकाणी सीमेमुळे दोन प्रांत वेगळे झाले. तिथे मोठा हिंसाचार घडला. रक्तपात झाला. बंगाल, बिहार येथे हिंसक आंदोलनं झाली. नवीन सीमेमुळे दोन्ही देशांचे २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

१४ ऑगस्टला संविधान सभेची बैठक होती. या बैठकीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेच्या बैठकीनंतर भारत स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली. या बैठकीत जवाहर लाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करत ट्रिस्ट विद डेस्टिनी नावाचं भाषण केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचं कोणतंही राष्ट्रगीत नव्हतं. रवींद्रनाथ टागोरांनी जन गण मन १९५० मध्ये लिहिलं होतं.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनMahatma Gandhiमहात्मा गांधीPakistanपाकिस्तानIndiaभारत