शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 2:53 AM

निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी केले.

पिंपरी - निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी केले.महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण व संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले त्या वेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, अमित गोरखे उपस्थित होते.ब्रिगेडीयर ओ. पी. वैष्णव म्हणाले, ‘‘भक्ती-शक्ती चौक हा भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेला चौक आहे. या ठिकाणी देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारल्यामुळे शहरातील नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल. शौर्य, वीरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचे प्रतीक भारतीय राष्ट्रध्वज आहे. भारतीय सैनिक लढाईला जाताना तिरंगा फडकावून येऊ अथवा तिरंग्यात लपेटून येऊ अशी शपथ घेतात. कारगिल युद्धामध्ये विजय प्राप्त करून तेथे तिरंगा ध्वज फडकवला गेला. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली, तेव्हापासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व कार्यालयात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल.’’महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात या ऐतिहासिक क्षणांची नोंद घेतली जाईल. देशातील सर्वांत उंचीचा हा राष्ट्रध्वज आपली मान अभिमानाने उंचावण्यास प्रेरणा देत राहील.’’स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज पिंपरी-चिंचवड शहरात उभारल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत झाले आहे.’’सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावरणाने प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली आहे. या ठिकाणी उपस्थित राहणारा प्रत्येक नागरिक हा या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. हे शहर आपले आहे अशी भावना मनात ठेवून शहराच्या विकासकामात सर्वांनी सहकार्य केल्यास पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील स्वच्छ, सुंदर व विकसनशील शहर म्हणून ओळखले जाईल.’’शहरातील मनपा शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी वेशभूषा परिधान करून हजारो तिरंगी फुगे आकाशात सोडले. भक्ती-शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाऊन निघाला होता. सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात भक्ती-शक्तीचा परिसर भारत माता की जय व वंदे मातरमच्या घोषणेने दुमदुमून गेला होता.भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या पथकाने ध्वजगीत सादर केले. तर देहूरोड येथील लष्कर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. संदीप पंचवाटकर यांचा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.देशभक्तीसाठी जागरूकराहाभक्ती शक्ती चौकातील देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत आहे. सर्व देशवासीयांनी भारतीय एकात्मता बाळगली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून, या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. उभारण्यात आलेल्या ध्वज परिसरात स्वच्छता ठेवा. कोठेही घाण करू नका. कचरा टाकण्यासाठी कुंडीचाच वापर करा. स्वच्छतेचे महत्त्व इतरांनाही सांगा. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान करणे गरजेचे असून, देशभक्ती जागृत ठेवणेही गरजेचे आहे.- सदानंद साळुंके, निवृत कर्नल

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८