शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:54 IST

निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी केले.

पिंपरी - निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व स्पेशल कमांडंट ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांनी केले.महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण व संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले त्या वेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त कर्नल सदानंद साळुंके, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी खासदार गजानन बाबर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, अमित गोरखे उपस्थित होते.ब्रिगेडीयर ओ. पी. वैष्णव म्हणाले, ‘‘भक्ती-शक्ती चौक हा भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेला चौक आहे. या ठिकाणी देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारल्यामुळे शहरातील नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल. शौर्य, वीरता, प्रगती, पवित्रता व सत्य यांचे प्रतीक भारतीय राष्ट्रध्वज आहे. भारतीय सैनिक लढाईला जाताना तिरंगा फडकावून येऊ अथवा तिरंग्यात लपेटून येऊ अशी शपथ घेतात. कारगिल युद्धामध्ये विजय प्राप्त करून तेथे तिरंगा ध्वज फडकवला गेला. राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास सुरुवात केली, तेव्हापासून क्रिकेट इतिहासात तिरंगी ध्वजाचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व कार्यालयात राष्ट्रध्वज लावल्यास राष्ट्रभक्तीची भावना तेवत राहण्यास मदत होईल.’’महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात या ऐतिहासिक क्षणांची नोंद घेतली जाईल. देशातील सर्वांत उंचीचा हा राष्ट्रध्वज आपली मान अभिमानाने उंचावण्यास प्रेरणा देत राहील.’’स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘देशातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज पिंपरी-चिंचवड शहरात उभारल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत झाले आहे.’’सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावरणाने प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली आहे. या ठिकाणी उपस्थित राहणारा प्रत्येक नागरिक हा या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला आहे. हे शहर आपले आहे अशी भावना मनात ठेवून शहराच्या विकासकामात सर्वांनी सहकार्य केल्यास पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील स्वच्छ, सुंदर व विकसनशील शहर म्हणून ओळखले जाईल.’’शहरातील मनपा शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी तिरंगी वेशभूषा परिधान करून हजारो तिरंगी फुगे आकाशात सोडले. भक्ती-शक्तीचा हा परिसर अवघ्या तिरंग्यात न्हाऊन निघाला होता. सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात भक्ती-शक्तीचा परिसर भारत माता की जय व वंदे मातरमच्या घोषणेने दुमदुमून गेला होता.भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सचिन काटकर यांनी केले. ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या पथकाने ध्वजगीत सादर केले. तर देहूरोड येथील लष्कर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. संदीप पंचवाटकर यांचा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.देशभक्तीसाठी जागरूकराहाभक्ती शक्ती चौकातील देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वजाखाली उभे राहून अत्यंत आनंद होत आहे. सर्व देशवासीयांनी भारतीय एकात्मता बाळगली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून, या भावनेमुळेच आपली खरी ओळख समाजात होते. उभारण्यात आलेल्या ध्वज परिसरात स्वच्छता ठेवा. कोठेही घाण करू नका. कचरा टाकण्यासाठी कुंडीचाच वापर करा. स्वच्छतेचे महत्त्व इतरांनाही सांगा. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान करणे गरजेचे असून, देशभक्ती जागृत ठेवणेही गरजेचे आहे.- सदानंद साळुंके, निवृत कर्नल

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८