शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

चिंताजनक! बालकांमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ; ग्रामीण भागात प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:48 IST

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ८४ टक्के बालकांवर उपचार करण्यात आले. अतिसार झालेल्या बालकांचे प्रमाण ८.५ टक्क्यांवरून ८.९ टक्के वाढले आहे.

मुंबई : राज्यात पाच वर्षांखालील बालकांमध्ये श्वसनाच्या आजारांचे प्रमाण २.४ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. या बालकांना ताप किंवा अन्य लक्षणे असूनही केवळ ७७ टक्के बालकांनाच उपचारांसाठी नेले होते.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ८४ टक्के बालकांवर उपचार करण्यात आले. अतिसार झालेल्या बालकांचे प्रमाण ८.५ टक्क्यांवरून ८.९ टक्के वाढले आहे. या बालकांना उपचारांसाठी नेण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. यातील ७२ टक्के बालकांना उपचारांसाठी नेण्यात आले होते, तर एनएफएचएस-४ मध्ये हे प्रमाण ७७ टक्के होते. ग्रामीण भागातील बालकांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त (१०.७ टक्के) आहे. बालकांच्या आरोग्याशी निगडित समस्यांकडे काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.अहवालातील निरीक्षणांनुसार बालकांमध्ये अतिस्थूलतेचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रमाण चार वर्षांपूर्वी १.९ टक्के होते. यंदाच्या अहवालात हे चार टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. सर्वाधिक स्थूल बालके शहरात ५.२ टक्के आढळली असून त्याखालोखाल ३.४ टक्के ग्रामीण भागात आढळली आहेत. तर दुसरीकडे रक्तक्षय झालेल्या बालकांचे प्रमाण ५३.८ टक्क्यांवरून ६८.९ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ग्रामीणमधील बालकांमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे, तर शहरी भागात ६६.३ टक्के नोंदले आहे.बदलत्या ऋतुमानासह प्रदूषण कारणीभूतकोरोना महामारी, हवामानातील तीव्र बदल, हवेचा खालावलेला दर्जा आणि प्रदूषणात होणारी वाढ यामुळे श्वसनाच्या विकारांत वाढ होताना दिसत आहे. याविषयी अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.- डॉ. अशोक ठाकूर, चेस्ट फिजिशिअनबालमृत्यूंत किंचित घट  एक आणि पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात अनुक्रमे ०.५ व ०.७ टक्क्यांनी  किंचित घट नोंदविण्यात आली असली तरी नवजात बालकांचा मृत्युदर मात्र १६.२ वरून १६.५ इतका वाढला आहे.  अहवालानुसार, आरोग्य विम्याचे संरक्षण असणाऱ्यांचे प्रमाण १५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.  ग्रामीण भागात १३.८ टक्के लाभार्थ्यांचे प्रमाण १९.९ टक्क्यांपर्यंत तर शहरातही १६ वरून २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.