शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचं आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ % करु; राहुल गांधीचं जाहीर सभेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 20:00 IST

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि त्याचे फायदे सांगितले होते

राज्यात आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर आला असताना देशातील ५ राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमध्येही आरक्षण आणि जातनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा ठरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या प्रचार सभांतून आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नागरिकांसाठी गॅरंटी म्हणून अनेक योजनांची घोषणाही केली जात आहे. राहुल गांधींनी तेलंगणातील प्रचार सभेत बोलताना आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाढविण्याची घोषणाच त्यांनी केली. तत्पूर्वी त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही एका प्रचारसभेत बोलून दाखवला होता.  

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि त्याचे फायदे सांगितले होते. जातनिहाय जणगणनेचा निर्णय ऐतिहासिक असेल. त्यामुळे संपूर्ण देशाचे चित्र बदलून जाईल. यामुळे देशातील ओबीसी आणि गरिबांना त्यांच्या खऱ्या लोकसंख्येविषयी माहिती मिळेल. त्यांना त्यांची शक्ती कळेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा सर्वांत क्रांतिकारी निर्णय असेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचे जोरदार समर्थन केले होते. आता, तेलंगणातील प्रचारसभेत त्यांनी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाढवून देण्याची घोषणा केली आहे. 

राहुल गांधींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीका केली. केसीआर यांनी जेवढा पैसा चोरी केलाय, तोच पैसा आम्ही गरिबांच्या हितासाठी वापरणार, असे राहुल यांनी म्हटले. यावेळी, राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना दरमहा २५०० रुपये आणि कॉलेज विद्यार्थ्यांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच, घर बांधण्यासाठीही ५ लाख रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. शेतकऱ्यांना १५ हजार वार्षिक, २०० युनिट वीज मोफत आणि ४ हजार मासिक पेन्शन देण्याचीही घोषणा केली. यावेळी, आरक्षणावरही भाष्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याची घोषणाच राहुल गांधींनी केली. येथे काँग्रेसने तेलंगणातील जनतेला ६ गॅरंटी दिल्या आहेत. तसेच, बीआरएसवर निशाणा साधताना बीआरएसची एकच गॅरंटी आहे ती म्हणजे गरिबांची लूट, असेही त्यांनी म्हटले.  

काँग्रेसची सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना

छत्तीसगडमध्ये राहुल गांधी असेही म्हणाले होते की, नरेंद्र मोदी हे जातनिहाय जनगणना करतील किंवा करणार नाहीत; परंतु, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यास सर्वप्रथम जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर सही केली जाईल. यातूनच गरिबांना त्यांची ताकद समजणार आहे. तुमच्यासोबत राहून तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष हा निर्णय घेणार आहे. आता कोणतीही शक्ती आम्हाला यापासून अडवू शकणार  नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणElectionनिवडणूक