शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसमावेशक विकास हाच प्राधान्यक्रम

By admin | Updated: February 23, 2015 23:20 IST

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी

नवी दिल्ली : संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले़आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली़ ‘सबका साथ, सबका विकास’ हेच केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले़ जनतेच्या इच्छा आणि आकांक्षेनुरूप संसदेत प्रगतिशील कायदे आणण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले़ सदस्यांनी परस्पर सहकार्य आणि सद्भावनेसह संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले़ग्रामविकास, गरिबी निर्मूलन, रोजगार वाढ यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत २०२२ पर्यंत सर्वांना निवारा देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ जन-धन योजनेअंतर्गत देशात १३़२ कोटी खाती उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ कौशल्य विकासावर भर देत, सर्वांचा सर्वसमावेश विकास हेच माझ्या सरकारचे ध्येय आहे़ सबका साथ, सबका विकास हेच माझ्या सरकारचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले़वादग्रस्त भूसंपादन कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून विरोध सुरू असताना, या कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे विकास साध्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केले़ भूसंपादन विधेयकातील बदल विकासासाठी आवश्यक आहे़ भूसंपादनामुळे प्रभावित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन यात बदल केले गेले आहेत़ दरम्यान, राज्यसभेवर निवडून आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाली आहे. मीर मोहम्मद फयाज, नझीर अहमद लावे (दोघेही पीडीपी), शमशेरसिंग मनहास (भाजप) यांच्यासह आझाद यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)