शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सर्वसमावेशक विकास हाच प्राधान्यक्रम

By admin | Updated: February 23, 2015 23:20 IST

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी

नवी दिल्ली : संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले़आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली़ ‘सबका साथ, सबका विकास’ हेच केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले़ जनतेच्या इच्छा आणि आकांक्षेनुरूप संसदेत प्रगतिशील कायदे आणण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले़ सदस्यांनी परस्पर सहकार्य आणि सद्भावनेसह संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले़ग्रामविकास, गरिबी निर्मूलन, रोजगार वाढ यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत २०२२ पर्यंत सर्वांना निवारा देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ जन-धन योजनेअंतर्गत देशात १३़२ कोटी खाती उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ कौशल्य विकासावर भर देत, सर्वांचा सर्वसमावेश विकास हेच माझ्या सरकारचे ध्येय आहे़ सबका साथ, सबका विकास हेच माझ्या सरकारचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले़वादग्रस्त भूसंपादन कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून विरोध सुरू असताना, या कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे विकास साध्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केले़ भूसंपादन विधेयकातील बदल विकासासाठी आवश्यक आहे़ भूसंपादनामुळे प्रभावित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन यात बदल केले गेले आहेत़ दरम्यान, राज्यसभेवर निवडून आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाली आहे. मीर मोहम्मद फयाज, नझीर अहमद लावे (दोघेही पीडीपी), शमशेरसिंग मनहास (भाजप) यांच्यासह आझाद यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)