शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सलाम! रेल्वे रुळाला पडलेला तडा पाहून महिलेनं साडी सोडून ट्रॅकवर बांधली; मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 13:33 IST

महिलेच्या प्रसंगावधानामुळे वाचले रेल्वे प्रवाशांचे प्राण; महिलेचं सर्वत्र कौतुक

आग्रा: एटाहून आग्र्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा अपघात टळला आहे. एका महिलेनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे. अवागढमधल्या नगला गुलरियाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. जवळच राहत असलेल्या ओमवती नावाच्या महिलेनं तडा पाहिला. तिला संभाव्य धोका लक्षात आला. तिनं वेळीच चालकाला इशारा दिला. त्यामुळे अपघात टळला.

गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ओमवती शेतात जात होत्या. ओमवती यांचं शेत रेल्वे रुळांच्या जवळ आहे. त्याचवेळी ओमवतींना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं दिसलं. अवागढच्या दिशेनं जाणारी ट्रेन तिथून पुढल्या काही क्षणांत जाणार होती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ओमवती यांनी स्वत:ची लाल रंगाची साडी सोडली आणि ती रेल्वे रुळांच्या मधोमध बांधली. त्यामुळे मोटरमनला धोका लक्षात आला. त्यानं वेळीच ब्रेक लावले आणि ट्रेन थांबली.

एटा रेल्वे स्टेशनमधून सकाळी साडे सात वाजता १५० प्रवाशांना घेऊन ट्रेन आग्र्याला रवाना झाली. ट्रेन ज्या रुळांवरून जाणार होती, त्याला तडा गेला होता. ही बाब ओमवती यांच्या वेळीच लक्षात आल्यानं आणि त्यांनी प्रसंगावधान राखल्यानं अपघात टळला. याबद्दल मोटरमननं ओमवती यांचं कौतुक केलं आणि त्यांना १०० रुपये बक्षीस म्हणून दिले.

गुलरिया भागात रुळाला तडा गेल्याची माहिती मोटरमननं रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर किमॅन आणि अन्य कर्मचारी दुरुस्तीसाठी पोहोचले. जवळपास अर्ध्या तासात दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आणि ट्रेन आग्र्याच्या दिशेनं रवाना झाली.