शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धक्कादायक! प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीसह ६ मैत्रिणींनी विष खाल्लं; तिघींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 07:51 IST

सहा तरुणींनी विष खाल्ल्यानं गावात खळबळ; ग्रामस्थांवर शोककळा

औरंगाबाद: बिहारच्या औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी सहा मैत्रिणींनी विष खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. यातल्या तिघींचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ माजली. मैत्रिणींपैकी एकीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यानं लग्नास नकार दिल्यानं सगळ्या तरुणींनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ओरंगाबादमधील कासमा पोलीस ठाण्याचा हद्दीत घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा मैत्रिणींनी एकाचवेळी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी तिघींचा मृत्यू झाला. तर तिघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या तिघींची प्रकृती चिंताजनक आहे.

औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते. तिनं याची माहिती मैत्रिणींना दिली होती. तरुणीनं प्रियकराकडे लग्नासाठी आग्रह धरला. त्यावेळी तिथे तिच्या मैत्रिणीदेखील उपस्थित होत्या. मात्र तरुणानं लग्नास नकार दिला. त्यानंतर सगळ्या तरुणी गावाकडे परतल्या. तरुणाच्या नकारानंतर त्याची प्रेयसी विष खात असल्याचं तिच्या मैत्रिणींनी पाहिलं. त्यानंतर सगळ्याच मैत्रिणींनी विष खाल्लं.

घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ माजली. ग्रामस्थांनी तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन तरुणींचा मृत्यू झाला. अन्य ती तरुणींना उपचारांसाठी मगध वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. एकाचवेळी सहा तरुणींनी विष खाल्ल्यानं आणि त्यातल्या तिघींचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. तरुणींच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्व तरुणी गुरारूला गेल्या होत्या आणि तिथून परतल्यावर त्यांनी विष खाल्ल्याची माहिती मिळत आहे.