शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

धक्कादायक! प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीसह ६ मैत्रिणींनी विष खाल्लं; तिघींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 07:51 IST

सहा तरुणींनी विष खाल्ल्यानं गावात खळबळ; ग्रामस्थांवर शोककळा

औरंगाबाद: बिहारच्या औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी सहा मैत्रिणींनी विष खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. यातल्या तिघींचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ माजली. मैत्रिणींपैकी एकीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यानं लग्नास नकार दिल्यानं सगळ्या तरुणींनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ओरंगाबादमधील कासमा पोलीस ठाण्याचा हद्दीत घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा मैत्रिणींनी एकाचवेळी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी तिघींचा मृत्यू झाला. तर तिघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या तिघींची प्रकृती चिंताजनक आहे.

औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते. तिनं याची माहिती मैत्रिणींना दिली होती. तरुणीनं प्रियकराकडे लग्नासाठी आग्रह धरला. त्यावेळी तिथे तिच्या मैत्रिणीदेखील उपस्थित होत्या. मात्र तरुणानं लग्नास नकार दिला. त्यानंतर सगळ्या तरुणी गावाकडे परतल्या. तरुणाच्या नकारानंतर त्याची प्रेयसी विष खात असल्याचं तिच्या मैत्रिणींनी पाहिलं. त्यानंतर सगळ्याच मैत्रिणींनी विष खाल्लं.

घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ माजली. ग्रामस्थांनी तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन तरुणींचा मृत्यू झाला. अन्य ती तरुणींना उपचारांसाठी मगध वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. एकाचवेळी सहा तरुणींनी विष खाल्ल्यानं आणि त्यातल्या तिघींचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. तरुणींच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्व तरुणी गुरारूला गेल्या होत्या आणि तिथून परतल्यावर त्यांनी विष खाल्ल्याची माहिती मिळत आहे.