शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धक्कादायक! प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीसह ६ मैत्रिणींनी विष खाल्लं; तिघींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 07:51 IST

सहा तरुणींनी विष खाल्ल्यानं गावात खळबळ; ग्रामस्थांवर शोककळा

औरंगाबाद: बिहारच्या औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी सहा मैत्रिणींनी विष खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. यातल्या तिघींचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ माजली. मैत्रिणींपैकी एकीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यानं लग्नास नकार दिल्यानं सगळ्या तरुणींनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ओरंगाबादमधील कासमा पोलीस ठाण्याचा हद्दीत घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा मैत्रिणींनी एकाचवेळी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी तिघींचा मृत्यू झाला. तर तिघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मगध वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या तिघींची प्रकृती चिंताजनक आहे.

औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते. तिनं याची माहिती मैत्रिणींना दिली होती. तरुणीनं प्रियकराकडे लग्नासाठी आग्रह धरला. त्यावेळी तिथे तिच्या मैत्रिणीदेखील उपस्थित होत्या. मात्र तरुणानं लग्नास नकार दिला. त्यानंतर सगळ्या तरुणी गावाकडे परतल्या. तरुणाच्या नकारानंतर त्याची प्रेयसी विष खात असल्याचं तिच्या मैत्रिणींनी पाहिलं. त्यानंतर सगळ्याच मैत्रिणींनी विष खाल्लं.

घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ माजली. ग्रामस्थांनी तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन तरुणींचा मृत्यू झाला. अन्य ती तरुणींना उपचारांसाठी मगध वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. एकाचवेळी सहा तरुणींनी विष खाल्ल्यानं आणि त्यातल्या तिघींचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. तरुणींच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्व तरुणी गुरारूला गेल्या होत्या आणि तिथून परतल्यावर त्यांनी विष खाल्ल्याची माहिती मिळत आहे.