शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मोदींवरून इम्रान खान देणार नवाज शरीफांना 'लेक्चर'

By admin | Updated: September 29, 2016 19:32 IST

पाकिस्तानातील विरोधी पक्षांकडून नवाज शरीफ यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 29 -  भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 35 ते 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानचं चांगलंच धाबं दणाणलं. भारताने हल्ला केला हे  पाकिस्तान सरकार आणि पाक मीडिया काही मानायलाच तयार नाही. मात्र, पाक मीडिया पंतप्रधान शरीफ यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेत आहे. शरीफ यांच्या कमकुवत भारत नीतीमुळेच भारताची हिम्मत वाढत आहे, त्यांना संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानची बाजू मांडता आली नाही म्हणून पाकला एकटं पाडण्यात भारत यशस्वी होत आहे असं पाक मीडियाने म्हटलं आहे. 
 
भारताच्या हल्ल्यानंतर  पाकिस्तान सरकार आणि पाक लष्करामध्ये किती सावळागोंधळ आहे हे स्पष्टपणे समोर आलं.  भारतानं केवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि यामध्ये आमचे दोन जवान मारले गेले असं पाकिस्तान सैन्य सांगत असल्याचा दावा डॉन, जिओ न्यूज, दुनिया न्यूज आदी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे. तर, दुसरीकडे भारताने केलेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तान सैन्याने तयार राहण्याचा आदेश पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिला आहे.  
 
त्याचवेळी, पाकिस्तानमधील पत्रकार हामिद मिर यांनी पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्यात भारताचे पाच जवान मारले गेल्याचा दावा केला आहे.
 
पाकिस्तानातील विरोधी पक्षांकडून मात्र नवाज शरीफ यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी तर शरीफ यांच्यावर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भारताच्या पंतप्रधानांना कसं उत्तर द्यावं हे शरीफ यांना कळत नाही. उद्या माझ्या रॅलीमध्ये मी मोदींना उत्तर देतो आणि शरीफ यांना दाखवून देतो की प्रत्युत्तर कसं द्यायचं असतं, असं पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान म्हणाले. शरीफ हे केवळ मुखवटा आहेत, राहील शरीफ हेच देश चालवत आहेत अशी टीका इम्रान यांनी यावेळी केली.  
 
उद्या इम्रान खान पाकिस्तानमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत, यावेळी भारताच्या पंतप्रधानांना सडेतोड उत्तर देऊ असं ते म्हणाले आहेत.