शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

मोदींवरून इम्रान खान देणार नवाज शरीफांना 'लेक्चर'

By admin | Updated: September 29, 2016 19:32 IST

पाकिस्तानातील विरोधी पक्षांकडून नवाज शरीफ यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 29 -  भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 35 ते 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानचं चांगलंच धाबं दणाणलं. भारताने हल्ला केला हे  पाकिस्तान सरकार आणि पाक मीडिया काही मानायलाच तयार नाही. मात्र, पाक मीडिया पंतप्रधान शरीफ यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेत आहे. शरीफ यांच्या कमकुवत भारत नीतीमुळेच भारताची हिम्मत वाढत आहे, त्यांना संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानची बाजू मांडता आली नाही म्हणून पाकला एकटं पाडण्यात भारत यशस्वी होत आहे असं पाक मीडियाने म्हटलं आहे. 
 
भारताच्या हल्ल्यानंतर  पाकिस्तान सरकार आणि पाक लष्करामध्ये किती सावळागोंधळ आहे हे स्पष्टपणे समोर आलं.  भारतानं केवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि यामध्ये आमचे दोन जवान मारले गेले असं पाकिस्तान सैन्य सांगत असल्याचा दावा डॉन, जिओ न्यूज, दुनिया न्यूज आदी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे. तर, दुसरीकडे भारताने केलेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तान सैन्याने तयार राहण्याचा आदेश पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिला आहे.  
 
त्याचवेळी, पाकिस्तानमधील पत्रकार हामिद मिर यांनी पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्यात भारताचे पाच जवान मारले गेल्याचा दावा केला आहे.
 
पाकिस्तानातील विरोधी पक्षांकडून मात्र नवाज शरीफ यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी तर शरीफ यांच्यावर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भारताच्या पंतप्रधानांना कसं उत्तर द्यावं हे शरीफ यांना कळत नाही. उद्या माझ्या रॅलीमध्ये मी मोदींना उत्तर देतो आणि शरीफ यांना दाखवून देतो की प्रत्युत्तर कसं द्यायचं असतं, असं पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान म्हणाले. शरीफ हे केवळ मुखवटा आहेत, राहील शरीफ हेच देश चालवत आहेत अशी टीका इम्रान यांनी यावेळी केली.  
 
उद्या इम्रान खान पाकिस्तानमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत, यावेळी भारताच्या पंतप्रधानांना सडेतोड उत्तर देऊ असं ते म्हणाले आहेत.