शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित एनआयएकडून आसाम हिंसाचाराची चौकशी राजनाथसिंग यांची घोषणा: बळीसंख्या ७८

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

गुवाहाटी/सोनितपूर :आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्‘ांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असून राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या बंडखोरांनी घडवून आणलेल्या निघृर्ण हत्याकांड व हिंसाचाराची चौकशी करणार आहे़ उल्फाविरुद्धच्या मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क करण्याचा विचारही सरकारने चालवला आहे़

गुवाहाटी/सोनितपूर :आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ह्यांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असून राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या बंडखोरांनी घडवून आणलेल्या निघृर्ण हत्याकांड व हिंसाचाराची चौकशी करणार आहे़ उल्फाविरुद्धच्या मोहिमेच्या धर्तीवर एनडीएफबी-एसविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी भूतान सरकारशी संपर्क करण्याचा विचारही सरकारने चालवला आहे़
एनडीएफबी-एस बंडखोरांनी आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सोनितपूर जिल्ह्यातील ३७, कोकराझर येथील २५ आणि चिरांग जिल्ह्यात तीन जण ठार झाले होते. या हत्याकांडाविरुद्ध आदिवासींनी सुरूकेलेले आंदोलन सोनितपूर जिल्ह्याच्या धेकियाजुलीमध्ये हिंसाचारझाल्यानंतर पोलिसांना काल बुधवारी गोळीबार करावा लागला होता़ त्यात तिघे ठार झाले होते़ आज गुरुवारी कोकराझारच्या गोसाईगावा येथे आदिवासींनी बोडो सुमदायाच्या घरांना आगी लावल्या़ आणखी सहा मृतदेह सापडल्यानंतर या हिंसाचारातील बळींची संख्या आता ७८ वर पोहोचली आहे़
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी हिंसाचारप्रभावित सोनितपूरचा दौरा केल़ा़ या दौऱ्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत, या हिंसाचाराची चौकशी एनआयएकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली़ मी याबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली़ या संपूर्ण हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी केली जाईल़ बोडो बंडखोरांना शह देणाऱ्यांबाबत कळायला हवे़ हा केवळ हिंसाचार नाही तर अतिरेकी कृत्य आहे़ हा दहशतवाद सरकार कदापि सहन करणार नाही़ एनडीएफबी(एस)विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले़ एनडीएफबी(एस) निश्चितपणे मोहीम छेडली जाईल़ मात्र कधी हे तूर्तास सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़

कोट
आसामातील हिंसाचार सरकारने अत्यंत गंभीरपणे घेतला आहे़ त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल़
- राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री

बॉक्स
हवी भूतानची मदत!
गुवाहाटी: डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड(एनडीएफबी-एस) बंडखोरांवर अंकुश आणण्यासाठी भूतानची मदत घेण्याचा विचार सरकारने चालवला आहे़ याप्रकरणी तात्काळ भूतानच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे विनंतीवजा आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केल्याचे कळते़
गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काल बुधवारी रात्री राजनाथसिंग यांनी स्वराज यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली व तात्काळ भूतानची मदत घेण्याचे आवाहन केले़ एनडीएफबीने भारत-भूतान सीमेवरील घनदाट जंगलात आपली काही ठिकाणे तयार केल्याचे मानले जाते़ भारतीय सुरक्षा दलांनी मोहीम उघडताच, एनडीएफबी बंडखोर पळून भूतान भागात दडून बसतात़ यामुळे त्यांच्यासोबत लढा देणे कठीण होते़
सन २००३-०४ मध्ये भूतानने उल्फाविरुद्ध मोहीम चालवून त्यांना आपल्या देशातून हाकलले होते व त्यांची सारी ठिकाणे नष्ट केली होती़