शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित- मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

माझे नाव गोवण्यात गलिच्छ राजकारण

माझे नाव गोवण्यात गलिच्छ राजकारण
मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा : केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा आरोप
भोपाळ : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यात काँग्रेस पक्षातर्फे आपले नाव गोवण्यात आल्याबद्दल केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या मुद्यावर अत्यंत गलिच्छ राजकारण खेळल्या जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मंगळवारी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, एक वर्षापूर्वी व्यापमं घोटाळ्याशी संबंधित बातम्यांमध्ये माझ्या नावाचा उल्लेख बघून आश्चर्य वाटले होते. ज्या प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची माझी मागणी आहे त्याच घोटाळ्यात अचानक सहा महिन्यांनंतर माझे नाव गोवले जावे हा एक राजकीय कटच आहे.
काँग्रेसने केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण याविषयी काहीही वक्तव्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दीड वर्षांपूर्वी व्यापमं घोटाळा उघडकीस आला त्यावेळी आपण मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या सुपूर्द करण्याचा सल्ला दिला होता. नंतर त्यांनी हे प्रकरण विशेष कृती दलाकडे (एसटीएफ) सोपविण्याचा निर्णय घेतला, असे भारती यांनी नंतर जारी केलेल्या बयानात सांगितले.
याप्रकरणी गेल्या वर्षीच पोलीस मुख्यालयात जाऊन बयान नोंदविण्याची माझी इच्छा होती. परंतु एसटीएफचे पोलीस महानिरीक्षक यांनी माझा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते, असे भारती यांचे म्हणणे आहे.
सकाळी शिवरात्री उत्सवानिमित्त येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या उमा भारती यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा या मुद्यावर आपण तूर्तास काहीही बोलणार नाही. योग्य वेळी पत्रकाद्वारे संपूर्ण चित्र स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले होते. पत्रक केव्हा काढणार? असे विचारले असता लवकरच, असेही त्या म्हणाल्या होत्या.
काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी या घोटाळ्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यावर कडाडून हल्ला चढविताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी मूळ एक्सेल शीटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला होता. तपास संस्थांनी भारती यांची भूमिका नाहक वाढवून चढवून दाखविली, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांचे म्हणणे होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पचौरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मूळ एक्सेल शीटमध्ये उमा भारती यांच्या नावाचा उल्लेख १० वेळा होता. परंतु शीटसोबत छेडछाड करून तो १७ वेळा करण्यात आला, असा दावा या नेत्यांनी केला आहे. भारती यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच असे करण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे होते. राज्यातील भाजपाच्या राजकारणात मुख्यमंत्री चौहान आणि उमा भारती हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. (वृत्तसंस्था)