शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सुधारित : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम, दाट धुक्याचे १२ बळी

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

जनजीवन विस्कळीत, अमृतसर ३.२ अंश सेल्सियस

जनजीवन विस्कळीत, अमृतसर ३.२ अंश सेल्सियस
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे. उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे घडलेल्या रस्ता अपघातात सातजण मृत्युमुखी पडले. तर पंजाबात तिघांचा मृत्यू झाला. राज्यात गुरुवारी दाट धुक्यामुळे रेल्वे आणि सडक वाहतूक विस्कळीत झाली. उत्तर भारतात गुरुवारी कमी दृश्यतेमुळे जवळपास १०० रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. धुक्यामुळे विमान वाहतूकही प्रभावित झाली आहे.
उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर येथे सर्वांत कमी २.५ अंश सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली. मैनपुरी येथे दोन आणि बदायूँ व बाराबंकी येथे प्रत्येकी एक जण रस्ता अपघातात ठार झाला. धुक्यामुळे दृश्यता कमी असल्याने हे अपघात घडले. तर बाराबंकी येथे दोन जणांचा थंडीमुळे मृत्यू झाला.
पंजाबात तिघांचा मृत्यू
पंजाबात थंडीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये थंडीची लाट कायम असून पारा घसरला आहे. अमृतसर येथे गुरुवारी ३.२ अंश सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली. थंडी आणि धुक्यामुळे वाहतूकही ठप्प पडली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी दाट धुक्यामुळे जीप आणि ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यात तीन जण ठार झाले.
काश्मिरात तापमान शून्याखाली
काश्मीर खोऱ्यातील तापमान शून्याखाली गेले आहे. राजधानी श्रीनगर येथे गुरुवारी तापमान उणे ३.९ अंश सेल्शियस होते. तर लडाख येथे सलग सातव्या दिवशी तापमान उणे १० अंश सेल्शियस नोंदविण्यात आले. तापमान शून्याखाली गेल्याने प्रसिद्ध डल सरोवर गोठण्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त आहे. गुरुवारी कारगीलमध्ये उणे १२.६ अंश सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली. (वृत्तसंस्था)