शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पुरुषांसाठी महत्त्वाची माहिती, आता खोट्या खटल्यात अडकवू शकणार नाहीत महिला, कोर्टाने दिले असे आदेश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:52 IST

Court News: मागच्या काही काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक असत्याचारांचं प्रमाम मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशा प्रकारचे अनेक खटले न्यायालयासमोर येत असतात. मात्र दुसरीकडे पुरुषांना अशा खोट्या खटल्यात अडकवण्याचे प्रमाणही वाढले आहे.

मागच्या काही काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक असत्याचारांचं प्रमाम मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशा प्रकारचे अनेक खटले न्यायालयासमोर येत असतात. मात्र दुसरीकडे पुरुषांना अशा खोट्या खटल्यात अडकवण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत केरळ उच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध पोलीस कारवाई करू शकतात, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी आदेश देताना कोर्टाने सांगितले की, जर एखाद्या महिलेने केलेले आरोप खोटे असल्याचे दिसून आले, तर तक्रारकर्त्या महिलेविरोधात कारवाई करता येईल. सर्व महिलांनी केलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे खरे असू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकरणात विस्तृत तपास होणे आवश्यक आहे. खोट्या तक्रारींमुळे केवळ अधिकारीच नाही तर न्यायालयांच्या वेळेचाही अपव्यय होतो. कोर्टाने लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात आरोपीला अंतरिम जामीन मंजूर करताना केली आहे.

कोर्टाने सांगितले की, काही पोलीस अधिकारी तक्रार खोटी असल्याचं सिद्ध झाल्यावर कारवाई करण्यास कचरतात. अशा प्रकरणात चिंता करण्याची आवश्यकता नाही. जर अधिकाऱ्यांनी केलेला तपास योग्य असेल तर कोर्ट त्यांच्या हितांचं रक्षण करेल. खोट्या तक्रारीमुळे संबंधित व्यक्तीला होणाऱ्या नुकसानाची भरपाई होऊ शकत नाही, त्यामुळे पोलिसांनी तपास करतानाच सत्य शोधून काढलं पाहिजे.

न्यायमूर्ती ए. बदरुद्दीन यांनी एक पोलीस अधिकारी आरोपी असलेल्या प्रकरणात ही टिप्पणी केली आहे. आरोपीने तक्रारकर्त्या महिलेसोबत अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपीवर महिलेला बेकायदेशीररीत्या कैद करण्यासह, एकाच महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप ठेण्यात आला होता. मात्र मला तक्रारदार महिलेसोबत लग्न करायचं होतं. मात्र ही महिला विवाहित असल्याचे आणि दोन मुलांची आई मला नंतर समजले, असा दावा आरोपीने केला होता.

या प्रकरणात याचिकाकर्ता आणि तक्रारदार महिला यांच्यात परस्पर सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाले होते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आहे. फसवणुकीच्या माध्यमातून सहमती मिळवली जाते, तेव्हाच ती गुन्हा ठरते. दरम्यान, लग्नाचं आश्वासन मिळाल्याने आपण लैंगिक संबंध प्रस्थापित केले, असे तक्रारकर्तीने सांगितले. मात्र जर एखादी विवाहित महिला घटस्फोट न घेताच लग्नाचं आश्वासन मिळालं म्हणून कुण्या अन्य व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल, तर परिस्थिती बदलते. अशा परिस्थितीत लग्नाचं आश्वासन हे निरर्थक ठरतं. तसेच हे आरोपही निराधार ठरतात, असेही कोर्टाने स्पष्ट केले.  

टॅग्स :Courtन्यायालयKeralaकेरळWomenमहिला