शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

हातकणंगलेत यड्रावकर गटाच्या भूमिकेला महत्त्व

By admin | Updated: February 3, 2017 00:19 IST

खोची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

खोची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
गेल्या दोन ते अडीच दशकांपासून हातकणंगले तालुक्याच्या राजकारणात यड्रावकर गट सक्रीय आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यरत असणारा यड्रावकर उद्योग समूह कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरलेला आहे. त्यामुळे काही भागात त्यांचा लक्षवेधी प्रभाव आहे. हातकणंगले तालुक्यातील बहुतांशी गावांत त्यांचा स्वतंत्र गट आहे. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना हे त्यांच्या राजकारणातील बैठकीचे प्रमुख केंद्र आहे.
कारखान्यात तालुक्यातील असणारे बहुसंख्य कर्मचारी वरील चार मतदारसंघांतील आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत; परंतु त्यांनी हातकणंगले तालुक्यात अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. सध्या राष्ट्रवादी पक्ष हातकणंगले तालुक्यात गतिमान झालेला दिसत नाही. शिरोळमध्ये मात्र सक्रीय झालेला आहे. कॉँग्रेस चार व राष्ट्रवादी तीन असे जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणूक लढविणार आहेत.
हातकणंगलेत मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर युती करण्याच्या प्रयत्नात आहे; परंतु युती होताना दिसत नाही. कॉँग्रेस, भाजप, सेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवक क्रांती आघाडी, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी (आवाडे गट) या विविध पक्ष, आघाड्या यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती केल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच गोंधळाची स्थिती पाहावयास मिळत आहे. अशा स्थितीत यड्रावकर गट मात्र जरी राष्ट्रवादीचा असला तरी तो शांतच आहे.
त्यांचे होम पिच शिरोळ तालुका आहे. तरीसुद्धा त्यांनी जर हातकणंगलेत सक्रीय होण्याचा प्रयत्न केला, तर दोन-तीन जिल्हा परिषद मतदारसंघांचा निकाल लावू शकतील, इतका गटाचा प्रभाव आहे. यामध्ये प्रामुख्याने कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या मतदारसंघांचा समावेश आहे. यासंदर्भात यड्रावकर गट लवकरच बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करेल, असे माहिती गटातील सूत्रांकडून मिळाली.