शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

हातकणंगलेत यड्रावकर गटाच्या भूमिकेला महत्त्व

By admin | Updated: February 3, 2017 00:19 IST

खोची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

खोची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
गेल्या दोन ते अडीच दशकांपासून हातकणंगले तालुक्याच्या राजकारणात यड्रावकर गट सक्रीय आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यरत असणारा यड्रावकर उद्योग समूह कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरलेला आहे. त्यामुळे काही भागात त्यांचा लक्षवेधी प्रभाव आहे. हातकणंगले तालुक्यातील बहुतांशी गावांत त्यांचा स्वतंत्र गट आहे. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना हे त्यांच्या राजकारणातील बैठकीचे प्रमुख केंद्र आहे.
कारखान्यात तालुक्यातील असणारे बहुसंख्य कर्मचारी वरील चार मतदारसंघांतील आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत; परंतु त्यांनी हातकणंगले तालुक्यात अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. सध्या राष्ट्रवादी पक्ष हातकणंगले तालुक्यात गतिमान झालेला दिसत नाही. शिरोळमध्ये मात्र सक्रीय झालेला आहे. कॉँग्रेस चार व राष्ट्रवादी तीन असे जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणूक लढविणार आहेत.
हातकणंगलेत मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर युती करण्याच्या प्रयत्नात आहे; परंतु युती होताना दिसत नाही. कॉँग्रेस, भाजप, सेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवक क्रांती आघाडी, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी (आवाडे गट) या विविध पक्ष, आघाड्या यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती केल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच गोंधळाची स्थिती पाहावयास मिळत आहे. अशा स्थितीत यड्रावकर गट मात्र जरी राष्ट्रवादीचा असला तरी तो शांतच आहे.
त्यांचे होम पिच शिरोळ तालुका आहे. तरीसुद्धा त्यांनी जर हातकणंगलेत सक्रीय होण्याचा प्रयत्न केला, तर दोन-तीन जिल्हा परिषद मतदारसंघांचा निकाल लावू शकतील, इतका गटाचा प्रभाव आहे. यामध्ये प्रामुख्याने कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या मतदारसंघांचा समावेश आहे. यासंदर्भात यड्रावकर गट लवकरच बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करेल, असे माहिती गटातील सूत्रांकडून मिळाली.