शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

भारताचे महत्त्व अमान्य असलेले दुही माजवितात - भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:00 IST

जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्व ज्यांच्या डोळ््यांना खुपत आहे अशा प्रवृत्ती इतिहासाचे विकृतीकरण करुन समाजात दुफळी माजवत आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केला.

वाराणसी : जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्व ज्यांच्या डोळ््यांना खुपत आहे अशा प्रवृत्ती इतिहासाचे विकृतीकरण करुन समाजात दुफळी माजवत आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केला.भागवत म्हणाले की, १८५७च्या स्वातंत्र्यसमराच्या आधीही देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्य व बंधुभाव होता. हे दोन्ही समाज नेहमीच एकत्र होते. मात्र १९०५ साली मुस्लीम लिगची स्थापना झाली आणि त्यानंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुलतत्ववादाचा प्रसार सुरू झाला. अजूनही या प्रवृत्ती समाजात मूळ धरून आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील ट्रेड फॅसिलिटेशन सेंटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजिलेल्या कार्यक्रमात स्वयंसेवकांसमोर बोलताना मोहन भागवत यांनी देशविघातक कार्य करणाºयांच्या विरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. रा. स्व. संघ हा सामाजिक सलोखा वाढावा, यासाठीच नेहमी प्रयत्नशील राहिला आहे. ज्याच्या मनात अहंकार नाही असे स्वयंसेवकच आपल्या कार्याद्वारे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेतेओम माथुर, महेंद्रनाथ पांडे, सुनील बन्सल, लक्ष्मण आचार्य आदी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)संघ स्वयंसेवकांनी एकजुटीने राहावे आणि संघभावनेने कार्याला वाहून घ्यावे. स्वयंसेवकांनी निस्वार्थी बुद्धीने कार्यरत राहावे, असे सांगून, आपण संघटनेपेक्षा मोठे आहोत अशी भावना तुमच्या मनात निर्माण होता कामा नये. संघाच्या स्वयंसेवकांनी सत्याचा मार्ग अनुसरावा व आपल्या मुल्यांशी कधीही प्र्रतारणा करु नये, असे स्वयंसेवकांना ऐकवले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत