शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

साखरेवरील आयात करात कपात करणार

By admin | Updated: May 24, 2016 03:49 IST

साखरेच्या वाढत्या भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी साखरेच्या आयातीवरील करात कपात करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सांगितले. या उपायानंतरही किमती वाढतच

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी साखरेच्या आयातीवरील करात कपात करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी सांगितले. या उपायानंतरही किमती वाढतच राहिल्या, तर साखरेची निर्यात बंद करण्यात येईल, असेही सरकारने म्हटले आहे. किरकोळ बाजारात साखरेचा भाव सध्या ४0 रुपये किलो झाला आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. २0१५-१६ मध्ये भारतातील साखरेचे उत्पादन घसरून २५ दशलक्ष टन झाले. आदल्या वर्षी ते २८.३ दशलक्ष टन होते. त्यामुळे भाव वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने हे निर्णय जाहीर केले. राज्यांच्या अन्नमंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, साखरेच्या किमती चाळिशीत आल्यामुळे गेल्या काही आठवड्यांत सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. साखरेच्या साठ्यावर नियंत्रण आणण्यात आले आहे. साखरेच्या निर्यातीसाठी देण्यात येणारी प्रति किलो ४.५0 रुपयांची सबसिडी मागे घेण्यात आली आहे. किमती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या उपाययोजना करू. किमती वाढतच राहिल्या तर आयात करात कपात केली जाईल. तसेच निर्यात पूर्णपणे बंद केली जाईल. पासवान म्हणाले की, साखरेच्या किमतीत वाढ काही प्रमाणात समर्थनीय आहे. साखरेचा उत्पादन खर्च प्रति किलो ३२-३३ रुपये असताना साखर कारखान्यांना गेल्या वर्षी साखर २२-२३ रुपये किलो दराने विकावी लागली. त्यामुळे गेल्या हंगामात ऊस उत्पादकांचे २१ हजार कोटी रुपये कारखान्यांकडे थकले होते. त्यावर सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे ही थकबाकी आता फक्त ८00 कोटी रुपये राहिली आहे. मात्र, त्याचवेळी आम्ही कारखानदारांना सांगू इच्छितो की, आम्ही साखरेच्या किमती अव्यवहार्य पद्धतीने वाढू देणार नाही. कारखान्यांकडील साखरेवर लक्ष ठेवा!उत्पादन खर्च ३२-३३ रुपये किलो असेल, तर साखरेचा आदर्श भाव काय असावा, या प्रश्नावर पासवान म्हणाले की, आम्ही बाजारातील किमती निर्धारित करीत नाही. साखर कारखानदारांनी आपले बीट मार्जिन काय असावे, हे ठरविले पाहिजे. आम्ही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना साखर कारखान्यांकडील साठ्यांवरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.