शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

साखरेवरील आयात शुल्क ४० टक्क्यांवर

By admin | Updated: April 29, 2015 23:25 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांकडील वाढत्या थकबाकीची कोंडी फोडण्यासाठी केंद्राने बुधवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : इथेनॉलवरील उत्पादन शुल्क रद्द; शेतकऱ्यांची थकबाकी अदा करता यावी, यासाठी उपाययोजनानवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांकडील वाढत्या थकबाकीची कोंडी फोडण्यासाठी केंद्राने बुधवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. साखरेवरील आयात शुल्क २५ टक्क्यांवरून वाढवून ४० टक्के करण्यात आले, तसेच कारखान्यांना शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यास मदत व्हावी यासाठी इथेनॉलवरील उत्पादन शुल्कही रद्द केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखान्यांकडील थकबाकी वाढून २१ हजार कोटी रुपये झाली आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खुल्या सामान्य परवान्याअंतर्गत साखरेच्या आयातीवरील शुल्क सध्याच्या २५ टक्क्यांवरून वाढवून ४० टक्के करण्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव आणखी खाली आल्याच्या स्थितीत आयात टाळता येऊ शकेल. सरकारने इंधनात मिसळण्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील उत्पादन शुल्कही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या इथेनॉलवर १२.३६ टक्के दराने उत्पादन शुल्क आकारण्यात येते. पुढील साखर हंगामात मळीतून निघणाऱ्या इथेनॉलला उत्पादन शुल्कातून सूट मिळेल. यातून मिळणारा फायदा साखर कारखाने व अंगीकृत मद्यार्क कंपन्यांना दिला जाईल. केंद्राने कापूस विपणन हंगाम २०१४-१५मध्ये ११० लाख गाठी कापसाला हमीदर देण्यासह चालू हंगामात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि त्याच्या एजंटांच्या कापूस खरेदीतील संभाव्य नुकसानीच्या भरपाईसाठी अतिरिक्त आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने या आशयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक विपणन महासंघ लि. ला सीसीआयचे उपएजंट म्हणून कापूस खरेदीसाठी पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. किमान हमीदर योजनेअंतर्गत कापूस खरेदीची मुख्य जबाबदारी सीसीआयकडे आहे. कापूस विपणन वर्ष २०१४-१५ साठी सामान्य धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ३,७५० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा एमएसपी ४,०५० रुपये ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे २०१४-१५ मध्ये ११० लाख गाठी कापसाला किमान आधारभूत किंमत देता येऊ शकेल, असे सरकारचे म्हणणे आहे.