शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

न्यायमूर्तींशी हुज्जतीनंतर महाभियोग याचिका मागे, घटनापीठ कोणी नेमले हे सांगण्याचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:48 IST

सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी दिलेली नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निर्णयाविरुद्ध दोन काँग्रेस खासदारांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी मंगळवारी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे जोरदार खडाजंगी झाली.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी दिलेली नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निर्णयाविरुद्ध दोन काँग्रेस खासदारांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी मंगळवारी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे जोरदार खडाजंगी झाली. मुळात हे घटनापीठ कोणी व कोणत्या अधिकारात गठित हे आधी स्पष्ट व्हायला हवे, यावरून वकिलांनी न्यायमूर्तींशी हुज्जत घातली.या मुद्द्यात न शिरता वकिलांनी गुणवत्तेवर युक्तिवाद करावा, यावर न्यायमूर्ती ठाम राहिले पण वयाचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिकाच मागे घेतल्याने या तणातणीवर अचानक पडदा पडला.प्रताप सिंग बाजवा (पंजाब) व डॉ. अमी हर्षद्रेय याज्ञिक या दोन राज्यसभा सदस्यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांनी सोमवारी सायंकाळी तातडीने न्या. ए. के. सिक्री, न्या.शरद बोबडे, न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अरुण मिश्रा आणि न्या. ए. के. गोयल यांचे घटनापीठ स्थापन केले. अत्यंत उत्कंठापूर्ण वातावरणात सकाळी १०.३० वाजता याचिका सुुनावणीसाठी पुकारली गेली. पण केवळ अर्धा-पाऊण तासांत सुनावणी संपली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलयांनी याचिकेच्या गुणवत्तेत शिरण्यापूर्वी आपल्यालाकाही प्राथमिक पण मुलभूत मुद्दे उपस्थित करायचे असल्याचे स्पष्ट केले. ही याचिका नेहमीच्या प्रथेप्रमाणे दोन वा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे न जाता थेट पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे कशी आली? हा निर्णय कोणी घेतला? कोणत्या अधिकारात घेतला? याचा खुलासा सर्वप्रथम केला जावा, असा त्यांचा आग्रह होता.न्या. सिक्री, न्या. बोबडे व न्या. गोयल यांनी घटनापीठ कोणी नेमले हा मुद्दा गैरलागू आहे व आम्ही त्यात पडू इच्छित नाही आणि पडू शकतही नाही, असे स्पष्ट केले. घटनापीठ कोणी नेमले हे जाणून घेऊन तुम्ही काय करणार? त्यातून काय साध्य होणार? असाही त्यांचा सिब्बल यांना सवाल होता. सिब्बल यांचे त्यावर म्हणणे होते की, घटनापीठ स्थापण्याच्या निर्णयाची प्रत आम्हाला द्या, म्हणजे मग आम्हाला त्या निर्णयासही आव्हान देता येईल.नोटीस ६४ जणांची, याचिका दोघांचीचराज्यसभा सभापतींच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ उभे राहिले व त्यांनी याचिकेसच आक्षेप घेतला. ही नोटीस राज्यसभेच्या ६४ सदस्यांनी दिली होती व याचिका त्यापैकी फक्त दोघांनीच केली आहे, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, एक तर राज्यघटनेनुसार नोटीस देण्यासाठी जेवढे किमान सदस्य (५०) लागतात तेवढ्यांनी याचिका करायला हवी किंवा ५० जणांचे संमतीपत्र घेऊन त्याहून कमी सदस्यांनी ती करावी. यावरूनही सिब्बल यांनी ‘असा कुठे नियम नाही’, असे म्हणत वाद घातला व आता ६४ सदस्यांच्या सहीची याचिका घेऊन येतो, असे सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDeepak Mishraदीपक मिश्राCourtन्यायालय