शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी उसाचा पालापाचोळा ऊस उत्पादनावर परिणाम : उद्योगावर मंदीचे सावट

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्‍या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़े

शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्‍या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़े
अक्कलकोट तालुक्यात दहिटणे येथे स्वामी सर्मथ सहकारी साखर कारखाना आणि रुद्देवाडी येथील मातोर्शी लक्ष्मीबाई शुगर हे दोन कारखाने आहेत़ शिवाय शेजारील तालुक्यात नव्याने उभारण्यात येणार्‍या कारखान्यांची भिस्त कुरनूर धरणाजवळील ऊस क्षेत्रावर अवलंबून आह़े ऊस उत्पादनासाठी तालुक्यात कुरनूर धरणाशेजारील कुरनूर, बावकरवाडी, चपळगाव, सिंदखेड, मोट्याळ, बर्‍हाणपूर, दहिटणे या गावात बहुतांश शेतकरी ऊस उत्पादनावर भर देत आले आहेत, परंतु धरणच कोरडे पडल्याने उसाची उभी पिके जळताना दिसत आहेत़ ऊस लागवड आणि तो सांभाळण्यासाठी केलेला खर्चही निघेल की नाही याची शंका आह़े त्यामुळे शेतकरी कर्जाबाजारात बुडत आह़े शिवाय मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नांसह अन्य समारंभ करणे मुश्कील झाल्याचे शेतकरी शिवानंद दुलंगे यांनी सांगितल़े

इन्फो बॉक्स
यंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतर
कुरनूर धरणातील पाणीसाठा संपल्याने ऊस उत्पादनावर साहजिकच त्याचा यंदा फार मोठा परिणाम होत आह़े सर्वत्र पाण्याअभावी बागायतीचे क्षेत्र घटले आह़े त्यामुळे उसाचे क्षेत्रदेखील कमी झाले आह़े नेमक्या याच कारणामुळे यंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतर असेल़ त्यातच काही पशुपालकांनी जनावरांसाठी चारा म्हणून उसाला प्राधान्य दिले आह़े धरण क्षेत्रातील मातोर्शी, कंचेश्वर, लोकमंगल, सिद्धेश्वर कारखान्याच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत, पण दरवर्षीप्रमाणे तोडण्यायोग्य ऊस नसल्याने कामगारही नाराज आहेत़ ऊस उत्पादन कमी झाल्याने गाळप हंगामही लवकर आटोपण्याची शक्यता असल्याचे लोकमंगलचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील यांनी सांगितल़े

कोट
पावसाअभावी खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आह़े त्यांचा आर्थिक भार कशाने भागवावा याची चिंता आह़े त्यामुळेच सोमवारचा आठवडा बाजार सुनासुना होत चालला आह़े शेतकर्‍यांचा खिसा रिकामा असल्याने तो बाजारपेठेत जाण्याचे धाडस करीत नाही, परिणामी व्यापार्‍यांवरही संक्रांत ओढवली आह़े
- अभिजित पाटील,
व्यापारी, अक्कलकोट

फोटो आह़े