शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी उसाचा पालापाचोळा ऊस उत्पादनावर परिणाम : उद्योगावर मंदीचे सावट

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्‍या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़े

शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्‍या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे जनावरांचे पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत़ विशेषत: उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आह़े
अक्कलकोट तालुक्यात दहिटणे येथे स्वामी सर्मथ सहकारी साखर कारखाना आणि रुद्देवाडी येथील मातोर्शी लक्ष्मीबाई शुगर हे दोन कारखाने आहेत़ शिवाय शेजारील तालुक्यात नव्याने उभारण्यात येणार्‍या कारखान्यांची भिस्त कुरनूर धरणाजवळील ऊस क्षेत्रावर अवलंबून आह़े ऊस उत्पादनासाठी तालुक्यात कुरनूर धरणाशेजारील कुरनूर, बावकरवाडी, चपळगाव, सिंदखेड, मोट्याळ, बर्‍हाणपूर, दहिटणे या गावात बहुतांश शेतकरी ऊस उत्पादनावर भर देत आले आहेत, परंतु धरणच कोरडे पडल्याने उसाची उभी पिके जळताना दिसत आहेत़ ऊस लागवड आणि तो सांभाळण्यासाठी केलेला खर्चही निघेल की नाही याची शंका आह़े त्यामुळे शेतकरी कर्जाबाजारात बुडत आह़े शिवाय मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नांसह अन्य समारंभ करणे मुश्कील झाल्याचे शेतकरी शिवानंद दुलंगे यांनी सांगितल़े

इन्फो बॉक्स
यंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतर
कुरनूर धरणातील पाणीसाठा संपल्याने ऊस उत्पादनावर साहजिकच त्याचा यंदा फार मोठा परिणाम होत आह़े सर्वत्र पाण्याअभावी बागायतीचे क्षेत्र घटले आह़े त्यामुळे उसाचे क्षेत्रदेखील कमी झाले आह़े नेमक्या याच कारणामुळे यंदाचा हंगाम कारखानदारांसाठी खडतर असेल़ त्यातच काही पशुपालकांनी जनावरांसाठी चारा म्हणून उसाला प्राधान्य दिले आह़े धरण क्षेत्रातील मातोर्शी, कंचेश्वर, लोकमंगल, सिद्धेश्वर कारखान्याच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत, पण दरवर्षीप्रमाणे तोडण्यायोग्य ऊस नसल्याने कामगारही नाराज आहेत़ ऊस उत्पादन कमी झाल्याने गाळप हंगामही लवकर आटोपण्याची शक्यता असल्याचे लोकमंगलचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील यांनी सांगितल़े

कोट
पावसाअभावी खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आह़े त्यांचा आर्थिक भार कशाने भागवावा याची चिंता आह़े त्यामुळेच सोमवारचा आठवडा बाजार सुनासुना होत चालला आह़े शेतकर्‍यांचा खिसा रिकामा असल्याने तो बाजारपेठेत जाण्याचे धाडस करीत नाही, परिणामी व्यापार्‍यांवरही संक्रांत ओढवली आह़े
- अभिजित पाटील,
व्यापारी, अक्कलकोट

फोटो आह़े