शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम, दलितांना बेदम मारहाणीद्वारे ठार मारण्याचे प्रकार तातडीने रोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:21 IST

पंतप्रधान मोदींना आवाहन; ४९ नामवंतांनी लिहिले खुले पत्र

नवी दिल्ली : मुस्लीम, दलित तसेच अल्पसंख्याक समुदायातील अन्य लोकांना बेदम मारहाण करून ठार मारण्याचे सध्या सुरू असलेले प्रकार तातडीने रोखावेत, असे खुले पत्र देशातील ४९ नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. या नामवंतांमध्ये दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेत्री अपर्णा सेन, गायिका शभा मुद्गल, इतिहासकार रामचंद्र गुहा आदींचा समावेश आहे.

या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत देशात ज्या घटना घडल्या त्याने आमच्यासारखे शांतताप्रिय व भारतीयत्वाचा अभिमान असलेले नागरिक मनातून दु:खी झाले आहेत. देशात २०१६मध्ये दलितांवरील अत्याचाराची ८४० प्रकरणे घडली. अशा प्रकरणांत आरोपींना शिक्षा सुनावण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे. ती वस्तुस्थिती पाहून आम्हाला धक्का बसला आहे.

‘जय श्रीराम’ ही घोषणा आता कोणाच्या तरी विरोधात माथी भडकाविण्यासाठी वापरली जात आहे. अल्पसंख्याकांना होत असलेल्या मारहाणीचा तुम्ही संसदेत निषेध केला. पण तेवढे पुरेसे नाही, असे नमूद करून जमावबळीचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली असा सवाल पत्रात पंतप्रधानांना करण्यात आला आहे. प्रख्यात बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी, दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती, सामाजिक कार्यकर्ते बिनायक सेन, समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांनीही या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

त्यांना राष्ट्रद्रोही ठरवू नकाया पत्रात म्हटले आहे की, राम हा देशातील बहुसंख्य लोकांसाठी पूजनीय आहे. रामाच्या नावाचा गैरवापर करणे त्वरित थांबवा. मतभेदांशिवाय खरी लोकशाही नांदूच शकत नाही. सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, शहरी नक्षलवादी ठरविण्यात येऊ नये.

टॅग्स :Muslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदी