शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुस्लीम, दलितांना बेदम मारहाणीद्वारे ठार मारण्याचे प्रकार तातडीने रोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:21 IST

पंतप्रधान मोदींना आवाहन; ४९ नामवंतांनी लिहिले खुले पत्र

नवी दिल्ली : मुस्लीम, दलित तसेच अल्पसंख्याक समुदायातील अन्य लोकांना बेदम मारहाण करून ठार मारण्याचे सध्या सुरू असलेले प्रकार तातडीने रोखावेत, असे खुले पत्र देशातील ४९ नामवंत व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. या नामवंतांमध्ये दिग्दर्शक श्याम बेनेगल, अभिनेत्री अपर्णा सेन, गायिका शभा मुद्गल, इतिहासकार रामचंद्र गुहा आदींचा समावेश आहे.

या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत देशात ज्या घटना घडल्या त्याने आमच्यासारखे शांतताप्रिय व भारतीयत्वाचा अभिमान असलेले नागरिक मनातून दु:खी झाले आहेत. देशात २०१६मध्ये दलितांवरील अत्याचाराची ८४० प्रकरणे घडली. अशा प्रकरणांत आरोपींना शिक्षा सुनावण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे. ती वस्तुस्थिती पाहून आम्हाला धक्का बसला आहे.

‘जय श्रीराम’ ही घोषणा आता कोणाच्या तरी विरोधात माथी भडकाविण्यासाठी वापरली जात आहे. अल्पसंख्याकांना होत असलेल्या मारहाणीचा तुम्ही संसदेत निषेध केला. पण तेवढे पुरेसे नाही, असे नमूद करून जमावबळीचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली असा सवाल पत्रात पंतप्रधानांना करण्यात आला आहे. प्रख्यात बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी, दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती, सामाजिक कार्यकर्ते बिनायक सेन, समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांनीही या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

त्यांना राष्ट्रद्रोही ठरवू नकाया पत्रात म्हटले आहे की, राम हा देशातील बहुसंख्य लोकांसाठी पूजनीय आहे. रामाच्या नावाचा गैरवापर करणे त्वरित थांबवा. मतभेदांशिवाय खरी लोकशाही नांदूच शकत नाही. सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, शहरी नक्षलवादी ठरविण्यात येऊ नये.

टॅग्स :Muslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदी