शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

‘तंबाखूच्या विक्रीवर त्वरित बंदी आणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:34 IST

गुटखा, पान मसाला, खैनी यासारख्या चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बंदीची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी कर्करोगतज्ज्ञांना केंद्र सरकारला केली आहे.

कोलकाता : गुटखा, पान मसाला, खैनी यासारख्या चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बंदीची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी कर्करोगतज्ज्ञांना केंद्र सरकारला केली आहे.तोंडाचा कर्करोग होण्याच्या नव्वद टक्के घटना चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांमुळे होतात यावर कर्करोगतज्ज्ञांचे एकमत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या पदार्थांवर घातलेल्या बंदीचा निर्णय सरकारने अमलात आणला तर तोंडाच्या कर्करोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल असे कर्करोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. कर्करोगतज्ज्ञ डॉ. सौरव दत्ता यांनी म्हणाले तंबाखुमुळे दरवर्षी १० लाख लोक मरण पावतात. त्यामुळे तंबाखुजन्य पदार्थांच्या सर्रास विक्रीवर बंदी आणली पाहिजे.घरातील माणसाच्या कर्करोगाने बळी गेल्याने कुटुंबाची घडी विस्कळीत होते. लाखो कुटुंबे त्यामुळे उद््ध्वस्त झाली आहेत. तंबाखुचा वापर कमी झाल्यास यावर नियंत्रण मिळविता येईल असे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी म्हणाले.संबंध हेल्थ फाऊंडेशनचे विश्वस्त संजय शेठ यांनी सांगितले की, भारतामध्ये २६.७ कोटी लोक तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करतात असा गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. दररोज ५५०० मुले तंबाखुजन्य पदार्थ वापरतात. तंबाखुचा वापर करणाºयांपैकी दोन तृतीयांश लोक अकाली मरण पावतात असेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>तंबाखूवर नियंत्रण हवेएड्स, मलेरिया, टीबी या रोगांपेक्षा कर्करोगाने मरण पावणाºयांची संख्या अधिक आहे. याचा विचार करुन तंबाखुचे पीक घेण्यावरही केंद्र सरकारने नियंत्रण राखण्याची वेळ आली आहे. तंबाखुचे पीक कमी केल्याने जे नुकसान होईल, त्याची भरपाई अन्य मार्गांनी करता येईल, असेही त्रिवेदी म्हणाले.