शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 18:31 IST

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  आज या कामगारांशी संवाद झाला आहे, कामगारांनी पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. मंगळवारी, सुरू असलेल्या बचाव कार्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी ६ इंची पाईप लाईनद्वारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संभाषण करुन केले. या कामगारांपैकी एक असलेल्या जयदेवने त्याच्या सुपरवायझरला त्याचा संदेश रेकॉर्ड करण्यास सांगितला.

'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

जयदेव बंगालीत म्हणाला, “कृपया रेकॉर्ड करा, मी माझ्या आईला काहीतरी सांगेन. आई, टेन्शन घेऊ नको आम्ही ठिक आहोत. आई, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. प्लीज तू आणि बाबा वेळेवर जेव.” हा संदेश यावेळी कामगाराने रेकॉर्ड केला. कामगारांशी सतत चर्चा करून त्यांचे मनोबल उंचावले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संवादात अधिकाऱ्यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काळजी करू नका, तुम्हा सर्वांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल, असे सांगितले.

दरम्यान, कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना काही संदेश द्यायचा आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यावर जयदेव यांनी त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले आहे. हे व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांच्या घरच्यांना पाठवले जाईल. जयदेव व्यतिरिक्त इतर मजुरांनीही त्यांच्या कुटुंबियांना निरोप पाठवला आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, तो बोगद्यात अडकला आहे, परंतु सर्वजण सुरक्षित आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांना लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दगडमातीचा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकून पडलेले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे कामगारांची सुटका होण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बोगदेविषयक तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी साइटवर अजून काही तांत्रिक मुद्दे आहेत, मात्र कामगारांना वाचवलं जात नाही तोपर्यंत ते कायम राहणार आहेत, असं सांगितलं आहे.  मात्र सर्व ४१ जण घरी पोहोचतील, तसेच कुणालाही साधी दुखापतही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड