शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 18:31 IST

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  आज या कामगारांशी संवाद झाला आहे, कामगारांनी पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. मंगळवारी, सुरू असलेल्या बचाव कार्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी ६ इंची पाईप लाईनद्वारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संभाषण करुन केले. या कामगारांपैकी एक असलेल्या जयदेवने त्याच्या सुपरवायझरला त्याचा संदेश रेकॉर्ड करण्यास सांगितला.

'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

जयदेव बंगालीत म्हणाला, “कृपया रेकॉर्ड करा, मी माझ्या आईला काहीतरी सांगेन. आई, टेन्शन घेऊ नको आम्ही ठिक आहोत. आई, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. प्लीज तू आणि बाबा वेळेवर जेव.” हा संदेश यावेळी कामगाराने रेकॉर्ड केला. कामगारांशी सतत चर्चा करून त्यांचे मनोबल उंचावले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संवादात अधिकाऱ्यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काळजी करू नका, तुम्हा सर्वांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल, असे सांगितले.

दरम्यान, कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना काही संदेश द्यायचा आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यावर जयदेव यांनी त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले आहे. हे व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांच्या घरच्यांना पाठवले जाईल. जयदेव व्यतिरिक्त इतर मजुरांनीही त्यांच्या कुटुंबियांना निरोप पाठवला आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, तो बोगद्यात अडकला आहे, परंतु सर्वजण सुरक्षित आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांना लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दगडमातीचा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकून पडलेले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे कामगारांची सुटका होण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बोगदेविषयक तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी साइटवर अजून काही तांत्रिक मुद्दे आहेत, मात्र कामगारांना वाचवलं जात नाही तोपर्यंत ते कायम राहणार आहेत, असं सांगितलं आहे.  मात्र सर्व ४१ जण घरी पोहोचतील, तसेच कुणालाही साधी दुखापतही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड