शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 18:31 IST

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  आज या कामगारांशी संवाद झाला आहे, कामगारांनी पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. मंगळवारी, सुरू असलेल्या बचाव कार्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी ६ इंची पाईप लाईनद्वारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संभाषण करुन केले. या कामगारांपैकी एक असलेल्या जयदेवने त्याच्या सुपरवायझरला त्याचा संदेश रेकॉर्ड करण्यास सांगितला.

'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

जयदेव बंगालीत म्हणाला, “कृपया रेकॉर्ड करा, मी माझ्या आईला काहीतरी सांगेन. आई, टेन्शन घेऊ नको आम्ही ठिक आहोत. आई, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. प्लीज तू आणि बाबा वेळेवर जेव.” हा संदेश यावेळी कामगाराने रेकॉर्ड केला. कामगारांशी सतत चर्चा करून त्यांचे मनोबल उंचावले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संवादात अधिकाऱ्यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काळजी करू नका, तुम्हा सर्वांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल, असे सांगितले.

दरम्यान, कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना काही संदेश द्यायचा आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यावर जयदेव यांनी त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले आहे. हे व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांच्या घरच्यांना पाठवले जाईल. जयदेव व्यतिरिक्त इतर मजुरांनीही त्यांच्या कुटुंबियांना निरोप पाठवला आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, तो बोगद्यात अडकला आहे, परंतु सर्वजण सुरक्षित आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांना लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दगडमातीचा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकून पडलेले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे कामगारांची सुटका होण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बोगदेविषयक तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी साइटवर अजून काही तांत्रिक मुद्दे आहेत, मात्र कामगारांना वाचवलं जात नाही तोपर्यंत ते कायम राहणार आहेत, असं सांगितलं आहे.  मात्र सर्व ४१ जण घरी पोहोचतील, तसेच कुणालाही साधी दुखापतही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड