शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळनंतर पुढचा भूकंप कुठे होणार?; IIT कानपूरच्या रिसर्चमध्ये सांगितली 'भविष्यवाणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:19 IST

IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने भूकंपामुळे भविष्यात धोक्याची घंटा असल्याची भीती व्यक्त केली आहे.

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाने हाहाकार माजला आहे. या भूकंपाचे धक्के नेपाळपासून दिल्लीपर्यंत जाणवले. दिल्ली-एनसीआरसोबतच यूपी-बिहारमध्येही जमीन हादरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि लोक घराबाहेर पडले. आता IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने भूकंपामुळे भविष्यात धोक्याची घंटा असल्याची भीती व्यक्त केली आहे.

कानपूर आयआयटीचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणतात की, एकाच ठिकाणी भूकंप होणं ही चिंतेची बाब आहे. कमी तीव्रतेचे आणखी भूकंप झाल्यास मोठा भूकंप होण्याचीही शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. नेपाळप्रमाणेच उत्तराखंड झोनही सक्रिय आहे, तेथेही भूकंप होण्याची शक्यता आहे.

प्रोफेसर मलिक म्हणतात की, नेपाळमध्ये येणारे भूकंप पश्चिमेकडे सरकत आहेत आणि जर ते पश्चिमेकडे सरकले तर त्याचा परिणाम उत्तराखंडवरही होईल असा ट्रेंड दिसून आला आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तराखंडमध्येही मोठा भूकंप होणार आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी शिरल्यावर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे भूकंपाचा धोका वाढत असल्याचंही एका संशोधनातून समोर आले आहे.

आयआयटी कानपूरमधील एका प्रकल्पामुळे, भूकंपाची शक्यता असलेल्या ठिकाणी फॉल्ट लाइन चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. अभ्यासाचा एक भाग म्हणून, किती तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो हे शोधून काढण्यात आले.

आयआयटी कानपूर टीमने अशी जागा ओळखली आहे जिथे भविष्यात प्लेट्स बदलू शकतात. हे संशोधन शहरी विकासक आणि नियोजकांना मदत करेल. या डेटाचा वापर करून, कोणत्या ठिकाणी जड बांधकाम आणि प्रकल्प करू नयेत हे जाणून घेणे शक्य होईल, जेणेकरून भूकंप आणि मोठी हानी होण्याची शक्यता टाळता येईल.

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार माजला होता. येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. यामुळे 132 जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली दबल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भूकंपामुळे सर्वाधिक मृत्यू रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये झाले आहेत. नेपाळमध्ये एवढा विध्वंस घडवून आणलेल्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात दिसून आल्याने या भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावता येतो. बिहारमधील पाटणा ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

टॅग्स :EarthquakeभूकंपNepalनेपाळUttarakhandउत्तराखंड