शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

मोदी सरकारकडून लोकशाही परंपरेची उपेक्षा

By admin | Updated: May 15, 2015 00:21 IST

लोकसभेत बहुमत मिळाल्यामुळे मोदी सरकार लोकशाही परंपरांची घोर उपेक्षा करीत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचा दुटप्पीपणा उघड झाला

शीलेश शर्मा, नवी दिल्लीलोकसभेत बहुमत मिळाल्यामुळे मोदी सरकार लोकशाही परंपरांची घोर उपेक्षा करीत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचा दुटप्पीपणा उघड झाला आहे, अशा शब्दात काँग्रेसने गुरुवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.ज्या महत्त्वपूर्ण विधेयकांची संसदेने समीक्षा करणे आवश्यक होते, ती विधेयके भाजपा सरकारने बहुमताच्या अहंकारापोटी समीक्षा न करताच थेट पारित करण्याचा मार्ग निवडला आणि विरोधकांवर सहकार्य न करण्याचा आरोप लावला. सामान्य विधेयकाला मनी विधेयक सांगून राज्यसभेकडे दुर्लक्ष केले. कारण राज्यसभेत आपल्याला बहुमत नाही, हे सरकारला ठाऊक होते. म्हणून विधेयक मनी विधेयकाच्या नावावर मांडले तर राज्यसभेत ते रोखले जाणार नाही, असा सरकारचा हेतू होता, असे लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.नियमानुसार मनी विधेयक रोखण्याचा अधिकार राज्यसभेला नाही आणि राज्यसभेने हे विधेयक पारित जरी केले नाही तरी ते लोकसभेने पारित केले असेल तर ते पारित झाल्याचे मानले जाते. राज्यसभेत असे विधेयक मांडणे ही केवळ औपचारिकता असते, हे येथे उल्लेखनीय आहे.सरकारचे असे वागणे हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे खरगे म्हणाले. ५५ विधेयकांपैकी वेळ ५ किंवा ६ विधेयकेच संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविण्यात आली आणि उर्वरित विधेयके सरकारने आपल्या बहुमताचा हवाला देऊन बळजबरीने पारित करवून घेतली, असा आरोप खरगे यांनी केला.गुलाम नबी आझाद म्हणाले, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष राज्यसभेत जीएसटी आणि भूसंपादन विधेयके पारित होऊ देणार नाहीत, हे ठाऊक असल्यामुळे सरकारने नाईलाजास्तव ही दोन्ही विधेयके संसदेच्या समित्यांकडे पाठविली. संसदेत विरोधी पक्ष असताना भाजपने बांगला देश भूमी आणि सीमा विधेयक पारित होऊ दिले नव्हते. ज्या विधेयकामुळे एक इंच जमीनही जाणार असेल तर अशा विधेयकाचे आम्ही समर्थन करणार नाही, असे भाजपाचे म्हणणे होते. परंतु सत्तेवर आल्यानंतर भाजपने आता तेच विधेयक आणले. हा भाजपाचा दुटप्पीपणा नाही तर आणखी काय आहे?