शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

स्थलांतरित मजूर हवे असल्यास आधी आमची परवानगी घ्या-  योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 00:32 IST

विविध राज्यांत श्रमिकांची पिळवणूक झाली

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील मजूर आपल्याकडे रोजगारासाठी परत यावेत, असे ज्या राज्यांना वाटत आहे, त्यांना आधी आमच्या राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.या मजुरांचे सामाजिक, आर्थिक व कायदेशीर हक्क शाबूत राखण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरित मजुरांची इतर राज्यांनी नीट काळजी घेतली नाही. यामुळे मनाला यातना झाल्या. हे मजूर आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून त्यांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी आम्ही एका आयोगाचीही लवकरच स्थापना करण्यात येईल. विविध राज्यांतून परतलेले किंवा परतत असलेले हे सारे लोक आमचे आहेत, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या आॅर्गनायझर व पांचजन्य या नियतकालिकांना दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ म्हणाले, परत आलेल्या सर्व स्थलांतरित मजुरांच्या नावांची नोंदणी तसेच त्यांच्या कामाचे कौशल्य काय आहे याची राज्य सरकार नोंदणी करणार आहे. विविध राज्यांत काम करत असताना या मजुरांची आर्थिक पिळवणूक झाली आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्या हक्कांची गळचेपी होऊ नये म्हणून राज्य सरकार त्यांना सामाजिक, आर्थिक व कायदेविषयक मदत करणार आहे. आमच्या राज्यातील मजुरांसाठी विमा, सामाजिक सुरक्षा, पुन्हा काम मिळविण्यासाठी मदत उपलब्ध करणे, बेकारांना निर्वाह भत्ता देणे या कशा प्रकारे साध्य करता येतील याचा अभ्यास राज्य सरकार स्थापन करणार असलेला आयोग करेल.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, विविध राज्यांतून २३ लाख स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशमध्ये परत आले आहेत. मुंबई व दिल्ली परतलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. तिथे स्थानिक मजुरांना काम मिळू शकेल. (वृत्तसंस्था )

स्थलांतरित आयोग स्थापणार : आदित्यनाथ

परराज्यांतून परतलेल्या २३ लाख मजुरांना शक्यतो राज्यातच रोजगार देण्याची व्यवस्था केली जाईल. तरीही काहींना रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये जावेच लागले तरी उत्तर प्रदेश सरकारची पूर्वसंमती घेतल्याशिवाय त्यांना कामावर ठेवता येणार नाही, अशी व्यवस्था करीत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले. ते म्हणाले, परराज्यात मजुरांची पिळवणूक होणार नाही, याची खात्री करण्यासाठी स्थलांतरित आयोगाची स्थापना करीत आहोत. आयोग अशा मजुरांच्या कल्याणाची काळजी घेईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश