शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

स्थलांतरित मजूर हवे असल्यास आधी आमची परवानगी घ्या-  योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 00:32 IST

विविध राज्यांत श्रमिकांची पिळवणूक झाली

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील मजूर आपल्याकडे रोजगारासाठी परत यावेत, असे ज्या राज्यांना वाटत आहे, त्यांना आधी आमच्या राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.या मजुरांचे सामाजिक, आर्थिक व कायदेशीर हक्क शाबूत राखण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरित मजुरांची इतर राज्यांनी नीट काळजी घेतली नाही. यामुळे मनाला यातना झाल्या. हे मजूर आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून त्यांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी आम्ही एका आयोगाचीही लवकरच स्थापना करण्यात येईल. विविध राज्यांतून परतलेले किंवा परतत असलेले हे सारे लोक आमचे आहेत, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या आॅर्गनायझर व पांचजन्य या नियतकालिकांना दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ म्हणाले, परत आलेल्या सर्व स्थलांतरित मजुरांच्या नावांची नोंदणी तसेच त्यांच्या कामाचे कौशल्य काय आहे याची राज्य सरकार नोंदणी करणार आहे. विविध राज्यांत काम करत असताना या मजुरांची आर्थिक पिळवणूक झाली आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्या हक्कांची गळचेपी होऊ नये म्हणून राज्य सरकार त्यांना सामाजिक, आर्थिक व कायदेविषयक मदत करणार आहे. आमच्या राज्यातील मजुरांसाठी विमा, सामाजिक सुरक्षा, पुन्हा काम मिळविण्यासाठी मदत उपलब्ध करणे, बेकारांना निर्वाह भत्ता देणे या कशा प्रकारे साध्य करता येतील याचा अभ्यास राज्य सरकार स्थापन करणार असलेला आयोग करेल.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, विविध राज्यांतून २३ लाख स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशमध्ये परत आले आहेत. मुंबई व दिल्ली परतलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. तिथे स्थानिक मजुरांना काम मिळू शकेल. (वृत्तसंस्था )

स्थलांतरित आयोग स्थापणार : आदित्यनाथ

परराज्यांतून परतलेल्या २३ लाख मजुरांना शक्यतो राज्यातच रोजगार देण्याची व्यवस्था केली जाईल. तरीही काहींना रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये जावेच लागले तरी उत्तर प्रदेश सरकारची पूर्वसंमती घेतल्याशिवाय त्यांना कामावर ठेवता येणार नाही, अशी व्यवस्था करीत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले. ते म्हणाले, परराज्यात मजुरांची पिळवणूक होणार नाही, याची खात्री करण्यासाठी स्थलांतरित आयोगाची स्थापना करीत आहोत. आयोग अशा मजुरांच्या कल्याणाची काळजी घेईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश