शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

चीनची गुर्मी उतरवायची असेल तर ताकद दाखवा - सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 16:40 IST

सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत आणि चीनमध्ये 73 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष मागच्या महिन्यात संपुष्टात आला.

ठळक मुद्देभारत आणि चीनने सैन्य मागे घेतल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आता पूर्ववत होत आहेत. वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे.

नवी दिल्ली, दि. 12 - सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत आणि चीनमध्ये 73 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष मागच्या महिन्यात संपुष्टात आला. दोन्ही देशांचे सैन्य परस्परापरस्परांसमोर उभे ठाकले होते. भारत आणि चीनने सैन्य मागे घेतल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आता पूर्ववत होत आहेत. पण भविष्यात पुन्हा असा संघर्ष उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताला रणनितीक मार्गदर्शन करणा-या सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने भारताला लष्करी क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

दशकभरापूर्वी संरक्षण मंत्रालयाने सीईएनजेओडब्ल्यूएसची स्थापना केली. वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. कारण चीन ताकतीचा आदर करतो असे सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने म्हटले आहे. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा जिथे मिळते त्या ट्राय जंक्शनवर चीनने रस्ता बांधणी सुरु करुन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा संघर्ष उदभवला. खरतर डोकलाम भूतानच्या हद्दीत येते. पण चीनला परस्पर 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा अधिकार नाही. कारण चीनच्या रस्ता बांधणीमुळे भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होणार होता. यापूर्वी 2014 मध्ये चुमार आणि 2013 साली डेपसांगमध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. सीईएनजेओडब्ल्यूएसने आपल्या अहवालात भारत-चीनसीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे कामही वेगाने करण्याची शिफारस केली आहे.

मध्यंतरी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. रावत यांचे हे विधान चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. भारताला एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध परवडणार नसल्याचे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते. जनरलनी नीट माहिती घेतली पाहिजे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध सुरु झाले तर, भारत परिणाम सहन करु शकेल का ? असे लेखात म्हटले होते. आम्ही पहिल्यांदा परिस्थिती चिघळेल अशी कृती करणार नाही आणि भारतालाही करु देणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते.

टॅग्स :Doklamडोकलाम