शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

चीनची गुर्मी उतरवायची असेल तर ताकद दाखवा - सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 16:40 IST

सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत आणि चीनमध्ये 73 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष मागच्या महिन्यात संपुष्टात आला.

ठळक मुद्देभारत आणि चीनने सैन्य मागे घेतल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आता पूर्ववत होत आहेत. वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे.

नवी दिल्ली, दि. 12 - सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत आणि चीनमध्ये 73 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष मागच्या महिन्यात संपुष्टात आला. दोन्ही देशांचे सैन्य परस्परापरस्परांसमोर उभे ठाकले होते. भारत आणि चीनने सैन्य मागे घेतल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आता पूर्ववत होत आहेत. पण भविष्यात पुन्हा असा संघर्ष उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताला रणनितीक मार्गदर्शन करणा-या सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने भारताला लष्करी क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

दशकभरापूर्वी संरक्षण मंत्रालयाने सीईएनजेओडब्ल्यूएसची स्थापना केली. वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. कारण चीन ताकतीचा आदर करतो असे सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने म्हटले आहे. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा जिथे मिळते त्या ट्राय जंक्शनवर चीनने रस्ता बांधणी सुरु करुन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा संघर्ष उदभवला. खरतर डोकलाम भूतानच्या हद्दीत येते. पण चीनला परस्पर 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा अधिकार नाही. कारण चीनच्या रस्ता बांधणीमुळे भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होणार होता. यापूर्वी 2014 मध्ये चुमार आणि 2013 साली डेपसांगमध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. सीईएनजेओडब्ल्यूएसने आपल्या अहवालात भारत-चीनसीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे कामही वेगाने करण्याची शिफारस केली आहे.

मध्यंतरी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. रावत यांचे हे विधान चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. भारताला एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध परवडणार नसल्याचे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते. जनरलनी नीट माहिती घेतली पाहिजे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध सुरु झाले तर, भारत परिणाम सहन करु शकेल का ? असे लेखात म्हटले होते. आम्ही पहिल्यांदा परिस्थिती चिघळेल अशी कृती करणार नाही आणि भारतालाही करु देणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते.

टॅग्स :Doklamडोकलाम