शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

'करकरे असते तर यापूर्वीच दोषमुक्त झालो असतो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 03:41 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचा पुण्यातील पत्रकार परिषदेत दावा

पुणे : हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविषयी मला आदर आहे़ ते असते तर यापूर्वीच मी या खटल्यातून दोषमुक्त झालो असतो. हुतात्म्याविषयी कोणी अनावधानानेही अवहेलना करु नये, असे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले़बॉम्बस्फोटातील आरोपी राकेश धावडे, त्यांच्या वकील नीता धावडे आदी उपस्थित होते़ कुलकर्णी म्हणाले, साध्वींनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे़ आमचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध नाही, हे करकरे यांना समजल्यानंतर आम्हाला मारहाण झाली नाही़ ते जिवंत असते तर त्यांनी दोषारोप दाखल करण्यापूर्वीच आम्हाला वगळले असते़ ते गेल्याने आमचे नुकसान झाले़ दहशतवाद विरोधी पथकातही काही चांगले अधिकारी आहेत, त्यांच्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत.नऊ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर राकेश धावडे यांचे चार प्रकरणातील निर्दोषत्व सिद्ध झाले. मी वकील असूनही त्याला मदत करुन शकले नाही, सामान्य आरोपींची काय गत होत असेल, असा प्रश्न अ‍ॅड़ नीता धावडे यांनी केला़ राकेश धावडे यांनी सांगितले की, मी इतिहासाचा अभ्यासक आहे़ तेव्हाच्या राजकारणाचा आम्ही बळी आहोत़ मला ६२ दिवस अमानवीय मारहाण झाली़ आता खटल्यातून पूर्णत: काढून टाकले आहे़प्रज्ञा सिंहांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीसाध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत खटला चालू आहे. त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, अजित अभ्यंकर, सुभाष वारे, किरण मोघे, सुनीती सु. र., डॉ. वर्षा आल्हाट आदी सुमारे चाळीस विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीपत्रावर स्वाक्षरी केली आहे.

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर