शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 13:23 IST

हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर

कोईमतूर: एअर स्ट्राइकमध्ये कोणतंच नुकसान झालं नाही, दहशतवादी मारले गेले नाहीत, भारतीय हवाई दलाचे बॉम्ब जंगलात पडले, असे विविध दावे करणाऱ्या पाकिस्तानला हवाई दलानं मोजक्या शब्दात चोख प्रत्युत्तर दिलं. आमचे बॉम्ब जंगलात जंगलात पडले असते, तर पाकिस्तानचे पंतप्रधान यावर बोलले नसते आणि त्यांच्याकडून प्रत्युत्तरादाखल कारवाईदेखील झाली नसती, असं उत्तर हवाई दलाचे प्रमुख बी. एस धनोआ यांनी पाकिस्तानला दिलं. भारतीय हवाई दलाचा हल्ला अयशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आला. त्यासाठी बालाकोट, चकोठी आणि मुझफ्फराबाद येथील भागांचे फोटो दाखवण्यात आले. या भागात सारं काही आलबेल असल्याचं चित्र पाकिस्ताननं उभं केलं. त्यावर हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. एअर स्ट्राइकदरम्यान टाकलेले बॉम्ब जंगलात पडले, असा दावा त्यांनी (पाकिस्ताननं) केला. पण आमचे बॉम्ब जर जंगलात पडले असते, तर त्यांनी (पाकिस्तानी पंतप्रधान) प्रत्युत्तर दिलं नसतं. आम्ही लक्ष्यभेद केला. त्यामुळेच तर प्रतिहल्ला करण्यात आला, असं धनोआ म्हणाले. हवाई दलाच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले, यावरुन सध्या देशात राजकारण सुरू आहे. त्यामुळे याबद्दलचा प्रश्नदेखील धनोआ यांना विचारण्यात आला. त्यावर किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो, असं उत्तर धनोआ यांनी दिलं. आम्ही फक्त लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो, किती दहशतवादी मारले हे मोजणं आमचं काम नाही, असं धनुआ यांनी स्पष्ट केलं.भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात यावरुन राजकारण सुरू झालं आहे. विरोधी पक्षांकडून नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी होत होती. तर, पाकिस्ताकडूनही या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं होतं. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी