शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

वाजपेयी सरकार असतं, तर 2004मध्येच काश्मीर प्रश्न सुटला असता- मेहबुबा मुफ्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 8:58 AM

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती,

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. त्या म्हणाल्या, काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत. तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदींनाही काश्मीरसाठी तेवढं काम करणं शक्य झालेलं नाही.2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती, असंही त्या म्हणाल्या आहेत. आजतकच्या 'अजेंडा आजतक' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी 2003मधल्या एका घटनेचा उल्लेखही केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी काश्मीरमध्ये एका रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. त्या रॅलीमध्ये जवळपास 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. त्यावेळी वाजपेयींनी जनतेच्या मनातलं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे जनताही खूश होऊन घरी गेली होती.2015मध्येही त्याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रॅली केली होती. त्यावेळीही 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. मोदींनी 80 हजार कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली, परंतु मोदींच्या घोषणेनं जनता खूश नव्हती. मोदींनी काश्मीरच्या प्रश्नावर अवाक्षरही काढलं नाही. वाजपेयी आणि मोदींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही काश्मीर सुंदर बनवणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यानंतर काश्मीरची परिस्थिती बिघडत गेली.इंदिरा गांधीही म्हणाल्या होत्या. सुईला परत फिरवता येत नाही. परंतु सुई त्याच जागेवर अडकून पडली आहे. कारगिल आणि संसदेवर हल्ल्यानंतरही वाजपेयींनी परवेज मुशर्रफ यांच्या बातचीत सुरूच ठेवली होती. कारण त्यांना माहीत होतं, काश्मीर प्रश्न हा गोळीनं नव्हे, तर चर्चेनं सुटणार आहे. वाजपेयींनी काश्मीरसाठी केलेल्या कामाच्या आधारवरच मी भाजपाशी युती करण्याचा नुकसानदायी निर्णय घेतला होता. काश्मीरची समस्या सुटेल असं मला वाटतं होतं. परंतु ती बाब फोल ठरली आहे. मोदींकडे बहुमताचं सरकार होतं. त्यांनी ठरवलं असतं तर काश्मीर प्रश्न सुटला असता. पण त्यांना तसं नको होतं, असंही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीर