शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयी सरकार असतं, तर 2004मध्येच काश्मीर प्रश्न सुटला असता- मेहबुबा मुफ्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 09:00 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती,

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. त्या म्हणाल्या, काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत. तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदींनाही काश्मीरसाठी तेवढं काम करणं शक्य झालेलं नाही.2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती, असंही त्या म्हणाल्या आहेत. आजतकच्या 'अजेंडा आजतक' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी 2003मधल्या एका घटनेचा उल्लेखही केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी काश्मीरमध्ये एका रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. त्या रॅलीमध्ये जवळपास 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. त्यावेळी वाजपेयींनी जनतेच्या मनातलं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे जनताही खूश होऊन घरी गेली होती.2015मध्येही त्याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रॅली केली होती. त्यावेळीही 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. मोदींनी 80 हजार कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली, परंतु मोदींच्या घोषणेनं जनता खूश नव्हती. मोदींनी काश्मीरच्या प्रश्नावर अवाक्षरही काढलं नाही. वाजपेयी आणि मोदींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही काश्मीर सुंदर बनवणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यानंतर काश्मीरची परिस्थिती बिघडत गेली.इंदिरा गांधीही म्हणाल्या होत्या. सुईला परत फिरवता येत नाही. परंतु सुई त्याच जागेवर अडकून पडली आहे. कारगिल आणि संसदेवर हल्ल्यानंतरही वाजपेयींनी परवेज मुशर्रफ यांच्या बातचीत सुरूच ठेवली होती. कारण त्यांना माहीत होतं, काश्मीर प्रश्न हा गोळीनं नव्हे, तर चर्चेनं सुटणार आहे. वाजपेयींनी काश्मीरसाठी केलेल्या कामाच्या आधारवरच मी भाजपाशी युती करण्याचा नुकसानदायी निर्णय घेतला होता. काश्मीरची समस्या सुटेल असं मला वाटतं होतं. परंतु ती बाब फोल ठरली आहे. मोदींकडे बहुमताचं सरकार होतं. त्यांनी ठरवलं असतं तर काश्मीर प्रश्न सुटला असता. पण त्यांना तसं नको होतं, असंही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीर