शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

वाजपेयी सरकार असतं, तर 2004मध्येच काश्मीर प्रश्न सुटला असता- मेहबुबा मुफ्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 09:00 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती,

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. त्या म्हणाल्या, काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत. तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदींनाही काश्मीरसाठी तेवढं काम करणं शक्य झालेलं नाही.2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती, असंही त्या म्हणाल्या आहेत. आजतकच्या 'अजेंडा आजतक' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी 2003मधल्या एका घटनेचा उल्लेखही केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी काश्मीरमध्ये एका रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. त्या रॅलीमध्ये जवळपास 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. त्यावेळी वाजपेयींनी जनतेच्या मनातलं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे जनताही खूश होऊन घरी गेली होती.2015मध्येही त्याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रॅली केली होती. त्यावेळीही 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. मोदींनी 80 हजार कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली, परंतु मोदींच्या घोषणेनं जनता खूश नव्हती. मोदींनी काश्मीरच्या प्रश्नावर अवाक्षरही काढलं नाही. वाजपेयी आणि मोदींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही काश्मीर सुंदर बनवणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यानंतर काश्मीरची परिस्थिती बिघडत गेली.इंदिरा गांधीही म्हणाल्या होत्या. सुईला परत फिरवता येत नाही. परंतु सुई त्याच जागेवर अडकून पडली आहे. कारगिल आणि संसदेवर हल्ल्यानंतरही वाजपेयींनी परवेज मुशर्रफ यांच्या बातचीत सुरूच ठेवली होती. कारण त्यांना माहीत होतं, काश्मीर प्रश्न हा गोळीनं नव्हे, तर चर्चेनं सुटणार आहे. वाजपेयींनी काश्मीरसाठी केलेल्या कामाच्या आधारवरच मी भाजपाशी युती करण्याचा नुकसानदायी निर्णय घेतला होता. काश्मीरची समस्या सुटेल असं मला वाटतं होतं. परंतु ती बाब फोल ठरली आहे. मोदींकडे बहुमताचं सरकार होतं. त्यांनी ठरवलं असतं तर काश्मीर प्रश्न सुटला असता. पण त्यांना तसं नको होतं, असंही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीर