शौचालय नसल्यास पुरस्कार परत घेणार
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST
जिल्हा परिषद : निर्मलग्राम पुरस्कृत ग्रामपंचायतींना इशारा
शौचालय नसल्यास पुरस्कार परत घेणार
जिल्हा परिषद : निर्मलग्राम पुरस्कृत ग्रामपंचायतींना इशारानागपूर : स्वच्छतेविषयी चांगले काम केल्याने जिल्ह्यात २००६ ते २०११ या कालावधीत ३०७ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले होते. या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारावर ५० हजार ते ५ लाखापर्यंत पुरस्कार स्वरूपात अनुदान देण्यात आले. परंतु या गावात आता वर्षात शौचालय नसलेले कुटुंब आहेत. शौचालय नसल्याचे आढळल्यास अनुदानात कपात करून निर्मलग्राम पुरस्कार परत घेतला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने संपूर्ण जिल्हा निर्मल करण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. निर्मलग्राम पुरस्कृ त ग्रामपंचायतींना स्वच्छताविषयक दर्जा सुधारण्यासह टिकवणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना तीन महिन्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.स्वच्छतेविषयी चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची दखल घेऊ न केंद्र सरकारने निर्मलग्रामने पुरस्कृत केले होते. पुरस्कारामुळे निर्मल दर्जा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. यातून समाजात स्वच्छतेची चळवळ सुरू झाली. पुढे या अभियानाचे निर्मल भारत असे नामकरण करण्यात आले. २ ऑक्टोबर २०१४ पासून या अभियानाचे नामकरण स्वच्छ भारत मिशन असे झाले आहे. एक पाऊ ल स्वच्छतेकडे असे अभियानाचे घोषवाक्य आहे. या अभियानाची व्याप्ती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणे अपेक्षित आहे; तेव्हाच खऱ्या अर्थाने उघड्यावरील शौचविधीचे निर्मूलन होऊ न २०१९ पर्यंत जिल्हा निर्मल व स्वच्छ होईल. ३०७ ग्रामपंचायतींपैकी काहींनी स्वच्छतेविषयी सातत्य टिकवून ठेवले नसल्याचे पायाभूत सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या ग्रामपंचायतींना तीन महिन्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)चौकट...निर्मलग्राम पुरस्कृत ग्रामपंचायतीपंचायत समिती ग्रामपंचायतीची निर्मलग्राम संख्या पुरस्कृत ग्रा.पं.भिवापूर ५६ ११हिंगणा ५५ २४कळमेश्वर ५१ ३०कामठी ४८ २४काटोल ८३ २४कुही ६० १४मौदा ६२ २३नागपूर ७० ४५नरखेड ७० ३६पारशिवनी ५२ १०रामटेक ४५ २१सावनेर ७५ २३उमरेड ४७ २२एकूण ७७४ ३०७