शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

दहशतवाद संपविण्याची इच्छा असेल, तर पाकला सैन्य पुरवू - राजनाथ सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 04:43 IST

राफेल असती तर बालाकोटची गरजच नव्हती, पाकिस्तानने आपले वागणे अजूनही सुधारावे

कर्नाल/चंदीगड : पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद समाप्त करण्याची पाकिस्तानची जर खरेच इच्छा असेल तर भारत त्यांना सैन्यपुरवठा करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकला सुनावले. पाकिस्तानला आपल्या देशाचे आणखी तुकडे व्हायला नको असतील तर त्यांनी आपले वागणे अजूनही सुधारावे, असा इशाराही त्यांनी दिला.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत पतौडी येथील प्रचारसभेत राजनाथसिंह म्हणाले: आज मला अत्यंत नम्रपणे पाकिस्तानला अशी सूचना करावीशी वाटते की, त्यांनी आपली विचारसरणी बदलावी. अन्यथा पाकिस्तानचे एकदा दोन तुकडे झालेच आहेत. आता त्याची अनेक शकले उडतील.ते असेही म्हणाले की, पाकिस्तानने प्रामाणिकपणे वागावे, दहशतवादाचे उच्चाटन करावे आणि बंधुभाव ठेवावा, असे मला त्यांना सांगावेसे वाटते. आपण शेजारी देश आहोत व आपल्याला एकत्रितच वाटचाल करायची आहे. तुम्ही स्वत:हून प्रामाणिकपणे दहशतवादाशी मुकाबला केला नाहीत, तर भारत स्वत:च्या जोरावर या शक्तिंचा बिमोड करण्यास भारत समर्थ आहे, हे पाकिस्तानने पक्के समजून घ्यावे.

कर्नाल येथील आणखी एका सभेत ते म्हणाले की, भारताकडे आधीपासूनच राफेल लढाऊ विमाने असती तर बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद््ध्वस्त करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसावेही लागले नसते. (राफेल विमानांनी) इथून भारतातूनच आपल्याला ते काम फत्ते करता आले असते, असेही राजनाथसिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)त्यांनी निष्कारण वाद घातला...फ्रान्समध्ये पहिले राफेल विमान स्वीकारल्यानंतर तेथे केलेल्या शस्त्रपूजेवरून झालेल्या वादाविषयी ते म्हणाले की, मी त्या लढाऊ विमानावर ‘ओम’ असे लिहून त्यास ‘रक्षा बंधन’ (लिंबू-मिरची) बांधले. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी वाद सुरू केला. आता आपल्याला राफेल मिळताहेत याचे स्वागत करण्याऐवजी त्यांनी निष्कारण वाद घातला. त्यांच्या अशा विधानांनी पाकिस्तानलाच अधिक बळ मिळते.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह