शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दहशतवाद संपविण्याची इच्छा असेल, तर पाकला सैन्य पुरवू - राजनाथ सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 04:43 IST

राफेल असती तर बालाकोटची गरजच नव्हती, पाकिस्तानने आपले वागणे अजूनही सुधारावे

कर्नाल/चंदीगड : पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद समाप्त करण्याची पाकिस्तानची जर खरेच इच्छा असेल तर भारत त्यांना सैन्यपुरवठा करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकला सुनावले. पाकिस्तानला आपल्या देशाचे आणखी तुकडे व्हायला नको असतील तर त्यांनी आपले वागणे अजूनही सुधारावे, असा इशाराही त्यांनी दिला.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत पतौडी येथील प्रचारसभेत राजनाथसिंह म्हणाले: आज मला अत्यंत नम्रपणे पाकिस्तानला अशी सूचना करावीशी वाटते की, त्यांनी आपली विचारसरणी बदलावी. अन्यथा पाकिस्तानचे एकदा दोन तुकडे झालेच आहेत. आता त्याची अनेक शकले उडतील.ते असेही म्हणाले की, पाकिस्तानने प्रामाणिकपणे वागावे, दहशतवादाचे उच्चाटन करावे आणि बंधुभाव ठेवावा, असे मला त्यांना सांगावेसे वाटते. आपण शेजारी देश आहोत व आपल्याला एकत्रितच वाटचाल करायची आहे. तुम्ही स्वत:हून प्रामाणिकपणे दहशतवादाशी मुकाबला केला नाहीत, तर भारत स्वत:च्या जोरावर या शक्तिंचा बिमोड करण्यास भारत समर्थ आहे, हे पाकिस्तानने पक्के समजून घ्यावे.

कर्नाल येथील आणखी एका सभेत ते म्हणाले की, भारताकडे आधीपासूनच राफेल लढाऊ विमाने असती तर बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद््ध्वस्त करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसावेही लागले नसते. (राफेल विमानांनी) इथून भारतातूनच आपल्याला ते काम फत्ते करता आले असते, असेही राजनाथसिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)त्यांनी निष्कारण वाद घातला...फ्रान्समध्ये पहिले राफेल विमान स्वीकारल्यानंतर तेथे केलेल्या शस्त्रपूजेवरून झालेल्या वादाविषयी ते म्हणाले की, मी त्या लढाऊ विमानावर ‘ओम’ असे लिहून त्यास ‘रक्षा बंधन’ (लिंबू-मिरची) बांधले. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी वाद सुरू केला. आता आपल्याला राफेल मिळताहेत याचे स्वागत करण्याऐवजी त्यांनी निष्कारण वाद घातला. त्यांच्या अशा विधानांनी पाकिस्तानलाच अधिक बळ मिळते.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह