शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

दहशतवाद संपविण्याची इच्छा असेल, तर पाकला सैन्य पुरवू - राजनाथ सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 04:43 IST

राफेल असती तर बालाकोटची गरजच नव्हती, पाकिस्तानने आपले वागणे अजूनही सुधारावे

कर्नाल/चंदीगड : पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद समाप्त करण्याची पाकिस्तानची जर खरेच इच्छा असेल तर भारत त्यांना सैन्यपुरवठा करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकला सुनावले. पाकिस्तानला आपल्या देशाचे आणखी तुकडे व्हायला नको असतील तर त्यांनी आपले वागणे अजूनही सुधारावे, असा इशाराही त्यांनी दिला.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत पतौडी येथील प्रचारसभेत राजनाथसिंह म्हणाले: आज मला अत्यंत नम्रपणे पाकिस्तानला अशी सूचना करावीशी वाटते की, त्यांनी आपली विचारसरणी बदलावी. अन्यथा पाकिस्तानचे एकदा दोन तुकडे झालेच आहेत. आता त्याची अनेक शकले उडतील.ते असेही म्हणाले की, पाकिस्तानने प्रामाणिकपणे वागावे, दहशतवादाचे उच्चाटन करावे आणि बंधुभाव ठेवावा, असे मला त्यांना सांगावेसे वाटते. आपण शेजारी देश आहोत व आपल्याला एकत्रितच वाटचाल करायची आहे. तुम्ही स्वत:हून प्रामाणिकपणे दहशतवादाशी मुकाबला केला नाहीत, तर भारत स्वत:च्या जोरावर या शक्तिंचा बिमोड करण्यास भारत समर्थ आहे, हे पाकिस्तानने पक्के समजून घ्यावे.

कर्नाल येथील आणखी एका सभेत ते म्हणाले की, भारताकडे आधीपासूनच राफेल लढाऊ विमाने असती तर बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळ उद््ध्वस्त करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसावेही लागले नसते. (राफेल विमानांनी) इथून भारतातूनच आपल्याला ते काम फत्ते करता आले असते, असेही राजनाथसिंह म्हणाले. (वृत्तसंस्था)त्यांनी निष्कारण वाद घातला...फ्रान्समध्ये पहिले राफेल विमान स्वीकारल्यानंतर तेथे केलेल्या शस्त्रपूजेवरून झालेल्या वादाविषयी ते म्हणाले की, मी त्या लढाऊ विमानावर ‘ओम’ असे लिहून त्यास ‘रक्षा बंधन’ (लिंबू-मिरची) बांधले. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी वाद सुरू केला. आता आपल्याला राफेल मिळताहेत याचे स्वागत करण्याऐवजी त्यांनी निष्कारण वाद घातला. त्यांच्या अशा विधानांनी पाकिस्तानलाच अधिक बळ मिळते.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह