शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राव, रेड्डी, पटनायक ठरतील किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 05:36 IST

लोकसभा निवडणुकांत कोणत्याच एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत कोणत्याच एका पक्षाला वा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे पक्ष काय भूमिका घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही पक्ष वा आघाडीला बहुमत न मिळाल्यास या तीन पक्षांची मनधरणी केल्याशिवाय सर्वात मोठा पक्ष वा आघाडीला पर्याय राहणार नाही.बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती व वायएसआर काँग्रेस हे सध्या भाजप वा काँग्रेस यांच्यापैकी कोणत्याही आघाडीत नाहीत. त्यांनी आपापल्या राज्यात स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या असून, त्यांना तिथे भाजप व काँग्रेस यांचा सामना करावा लागला आहे. पंतप्रधान मोदी व भाजप यांनी या तिन्ही पक्षांना चुचकारण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.हे पक्ष निवडणुकीनंतर नेमकी काय भूमिका घेणार, हे स्पष्ट झालेले नाही. ओडिशामध्ये लोकसभेच्या २१, आंध्र प्रदेशात २५ व तेलंगणात १७ अशा एकूण ६३ जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकांत त्यापैकी बिजू जनता दलाने २०, वायएसआर काँग्रेसने ९ व टीआरएसने ११ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच ६३ पैकी ४० खासदार या तीन पक्षांचे होते. त्यांना यंदाही तितक्या वा त्याहून अधिक जागा मिळाल्यास तेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

त्यापैकी टीआरएसचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक पक्षांची आघाडी बनवण्याचा प्रयत्न चालवला असला तरी त्यांना यश येताना दिसत नाही. द्रमुक, जनता दल (धर्मनिरपेक्ष), बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस यापैकी एकाही पक्षाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. राव यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची अलीकडेच भेट घेतली. पण त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही राव यांच्या आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाही.बिजू जनता दलाचे प्रमुख व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही भूमिका जाहीर केलेली नाही. चक्रीवादळात उचललेल्या पावलांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. तरीही पटनायक बोलायला तयार नाहीत. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनीही आपले पत्ते आतापर्यंत उघड केलेले नाही. मात्र वायएसआर काँग्रेस व टीआरएस यांचा तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना विरोध आहे.नायडू यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसची मैत्री केली आहे. त्यामुळे नायडू असलेल्या आघाडीत रेड्डी व चंद्रशेखर राव यांना जुळवून घ्यावे लागेल. अर्थात राजकारणात कोणीच कोणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो. त्यापैकी चंद्रशेखर राव यांनी भाजपसोबत न जाण्याचे संकेत दिले आहेत. वायएसआर काँग्रेस हा पक्षच मुळी काँग्रेसमधील फुटीतून निर्माण झाला आहे. त्यामुळे तो पक्ष भाजपपेक्षा आपल्याकडे येण्याची अधिक शक्यता असल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.मतदानाचा शेवटचा टप्पा १९ मे रोजी संपला की २१ मे रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यास चंद्रशेखर राव उपस्थित राहतील, असे कळते. मात्र रेड्डी व पटनायक हे बैठकीला हयि राहणार का, हे अद्याप नक्की नाही.

उपपंतप्रधानपद हवे?तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विरोधकांच्या आघाडीसह जाण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. मात्र विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास आपणास उपपंतप्रधानपद दिले जावे, अशी त्यांची अट असल्याचे सांगण्यात येते. त्यांची ही अट टीआरएसच्या नेत्यांनी काँग्रेसपर्यंत पोहाचवली आहे; पण निकाल लागेपर्यंत त्याबाबत निर्णयच घेऊ नये, असे काँग्रेसने ठरवले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक