शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

नीरव मोदीची दरमहा ५० कोटी देण्याची आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 03:56 IST

पंजाब नॅशनल बँकेच्या ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दरमहा ५० कोटी रुपये.....

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून कायदेशीर देण्याची पै न पै चुकती करण्याची ताजी ‘आॅफर’ दिली आहे. शक्य असेल तर तडजोड करणे शक्य व्हावे, यासाठी मोदी सरकारने या घोटाळ््यावर कोणतेही थेट भाष्य न करता, दोन हात दूर राहून बँका आणि तपासी यंत्रणांना हे प्रकरण हाताळू देण्याचा सावध पवित्रा घेतला आहे. वित्त मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, हा ताजा घोटाळा उघड झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच (पीएनबी)े व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीसुनिल मेहता यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतही नीरव मोदीने दिलेल्या ‘आॅफर’चा मुद्दा निघाला होता. परंतु ती ‘आॅफर’ मोघम असल्याचे सांगून मेहता यांनी तो विषय तेवढ्यावरच सोडला होता. परंतु निरव मोदीने त्यानंतर पीएनबी, प्राप्तिकर विभाग व ‘ईडी’ यांना पाठविलेल्या ताज्या ई-मेलमध्ये दरमहा ५० कोटी रुपये याप्रमाणे परतफेड करण्याची ‘आॅफर’ दिली आहे.सूत्रांनुसार ‘पीएनबी’ व अन्य बँकांचे वरिष्ठ अधिकारी निरव मोदीची ही ताजी आॅफर स्वीकरणे कितपत शक्य आहे यावर अहोरात्र खल करत आहेत. त्यासाठी ते मेहुल चोकसी यांच्या गितांजली ग्रुपला वेगळे काढून फक्त निरव मोदीशी संबंधित कंपन्यांची देणी निश्चित करण्यात व्यग्र आहेत. दंड, व्याज वगैरे माफ केले तर निरव मोदीची देणी पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास निघू शकतील. परंतु या आॅफरची गुणवत्तेवर शहानिशा करून त्यावर आपली नक्की भूमिका संबंधितांना कळविण्याची जबाबदारी आता ‘पीएनबी’वर आहे. दरमहा ५० कोटी ही रक्कम अगदीच कमी असल्याने ही आॅफर मान्य होण्याची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांना वाटते.तरीही शक्यतेच्या मर्यादेत असेल तर आजवर सर्वाधिक अडचणीत आणणारा विषय ठरलेल्या या प्रकरणाची तड लागावी, अशी सरकारची इच्छा आहे. याच कारणावरून सरकार सावध पावले टाकून तपासी यंत्रणा व बँका यांना आपल्या अधिकारात निर्णय घेण्याची मोकळिक देत आहे. सूत्रांनुसार म्हणूनच सरकारने निरव मोदीचा पासपोर्ट फक्त एक महिन्यासाठी निलंबित करून त्याला अद्याप फरार घोषित केलेले नाही. कोणतेही अटक वॉरन्ट न काढता त्याला फक्त जबाबांसाठी हजर राहण्याची नोटीस जारी करणयात आली आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही माध्यमांसमोर न येता सहेतूक मौन पाळले आहे. मोदी व जेटीली यांनी डावपेंच म्हणून गप्प राहण्याचे ठरविल्यावर विरोधकांचे हल्ले परतूव लावण्यासाठी सरकारतफे निर्मला सितारामन, रविशंकर प्रसाद व प्रकाश जावडेकर या केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरविले. यावरून सरकार या घोटाळयापासून दोन हात दूर राहू पाहात असल्याचे जाणवते.कोणताही गुन्हा केलेला नाहीआपण प्रचलित बँकिंग प्रणालीचा अवलंब केला, असा पवित्रा नीरव मोदी याने घेतला असून आपल्याला पूर्वीप्रमाणे नियमित व्यवसाय करू दिला तर दरमहा ५० कोटी रुपयांची परतफेड करून कायदेशीर देण्याची पै न पै चुकती करण्याची तयारी दर्शविली आहे.घोटाळ््यावरून विरोधकांनी रान उठविले असताना सरकारमधील सर्वोच्च पदांवरील व्यक्तींनी धारण केलेले मौन सूचक असून नीरव मोदीला यातून बाहेर पडता यावे यासाठी परतीचे सर्व दोन कापून न टाकण्याची काळजी घेतली जात आहे, असे माहितगारांना वाटते.रविवारी मोदी यांची दिल्ली व मुंबईत मिळून तीन भाषणे झाली. पण मोदी यांनी या घोटाळ््याविषयी शब्द काढला नाही.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा