शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मोदींचे सरकार आल्यास भाजप मंत्र्यांचा कोटा कमी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 04:49 IST

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संभाव्य सरकारमध्ये बिहारमधील भाजपच्या काहींना मंत्रीपद गमवावे लागेल.

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मतदार कौल कोणाला मिळतो? कोणाचे किती खासदार आणि सरकार कोणाचे येईल? याचा फैसला गुरुवारी सायंकाळपर्यंत होणार आहे. तथापि, मतदानोत्तर चाचणीच्या निष्कर्षानुसार केंद्रात पुन्हा मोदींचे सरकार आल्यास सरकारमधील भाजपा वाटा कमी होऊ शकतो. जेडीयू, शिवसेनेला प्राधान्य देण्यासोबतच ईशान्येकडील आघाडीला प्राथमिकता देण्यासाठी भाजपवर दबाव असेल. त्यामुळे बिहारच्या काही मंत्र्यांची पुन्हा वर्णी लागणार नाही.

भाजपच्या सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात मंत्र्यांशी चर्चा करतांना स्पष्ट केले की, येथे उपस्थित असलेल्यांपैकी काही सहकाऱ्यांना नवीन मंत्रिमंडळात घेऊ शकणार नाही; म्हणजे त्यांना दुर्लक्षित केले जाईल, असा याचा अर्थ नाही. त्यांचे पक्षासाठीचे समर्पण आणि बांधिलकी निश्चितच लक्षात घेतली जाईल.

भाजपप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीच्या संभाव्य सरकारमध्ये बिहारमधील भाजपच्या काहींना मंत्रीपद गमवावे लागेल. जेडीयूने चार ते पाच खासदारांप्रती एक मंत्रीपद हे सूत्र लागू करण्याचे सूचित केले आहे. महाराष्टÑातूनही शिवसेनेचा दबाव असेल. मागच्या सरकारमध्ये अपेक्षेप्रमाणे मंत्रीपदे न मिळाल्याने शिवसेना नाराजी व्यक्त करीत होती. या दबावामुळेच लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी स्वत:ऐवजी पूत्र चिराग पासवान यांना मंत्री करु, असे मत उघडपणे व्यक्त केले होते. आधीप्रमाणे एकच मंत्रीपद मिळेल, स्वत: की मुलाला मंत्री करणार, हे त्यांनी ठरवावे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच त्यांना मिळाले असावेत.

प. बंगाल, दिल्ली तसेच ओडिशाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यासाठीही दबाव असेल. परिणाम बिहारमधील भाजपच्या मंत्र्यांची संख्या कमी होऊ शकते. एक किंवा दोन मंत्र्यांना सरचिटणीसपद देऊन त्यांचे समायोजन केले जाण्याची शक्यता आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९